शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

भारी धानपीक मृत्यूशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 02:57 IST

ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे.

शेतकरी चिंतातूर : ओवारा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता व शाखा अभियंत्याचा प्रतापआमगाव : ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे. मागील एक वर्षापासून कालव्यांना पडलेल्या भेगा बुजविण्यात न आल्याने भारीधान एका पाण्यासाठी मृत्यूश्येवर झुंज देत आहे. मात्र कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता क्रियाशील नाहीत. तक्रारी करुन निधी नाहीच्या नावावर केवळ लिपापोती केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केला आहे. ओवारा प्रकल्पाचा एक कालवा वळद, सोनेखारी या परिसरातील जवळपास एक हजार एकर शेतीला सिंचन करतो. मात्र मागील दोनतीन वर्षापासून कालव्याला पडलेल्या भेगांमुळे शेतीपर्यंत पाणी जात नाही. याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या कालव्याला उन्हाळ्यात रबीकरिता पाणी दिला जातो. मात्र दुसरा असलेला कालवा त्याच सोनेखारी, वळद व परिसरातील गावांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीला सिंचन करण्यात अपयशी ठरला आहे. कालव्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यांना बुजविण्यात किंवा डागडुजी करुन शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता कार्यकारी अभियंता गेडाम व शाखा अभियंता धपाडे यांनी कोणतेच प्रयत्न चालविले नाही. उलट निधी नसल्याचे सांगून चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे भारी धान पाण्याअभावी मरणाच्या तयारीत आहेत. यात दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केली. या कालव्याला लागून कटंगटोला हे गाव असून येथील अपंग शेतकरी लाडकू ठाकरे यांची तीन एकर शेती पाण्याने मरत आहे. लाडकू ठाकरेला फक्त एक हात असून एकाच हाताने फुटलेली कालव्याची पाळ जीव धोक्यात घालून मुलासोबत तयार केली व शेतीपर्यंत पाणी नेण्याचे रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. मात्र कालव्याला पाणी कमी येत असल्याने वळद, सोनेखारी, कटंगटोला या गावांना पाणी चढत नाही. अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र पूर्णपणे त्यांनी डोळेझाक केली आहे. हातात आलेले पीक पाण्याअभावी जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी किशोर रहांगडाले, जियालाल पंधरे व नोहरलाल चौधरी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)