शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

भारी धानपीक मृत्यूशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 02:57 IST

ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे.

शेतकरी चिंतातूर : ओवारा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता व शाखा अभियंत्याचा प्रतापआमगाव : ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे. मागील एक वर्षापासून कालव्यांना पडलेल्या भेगा बुजविण्यात न आल्याने भारीधान एका पाण्यासाठी मृत्यूश्येवर झुंज देत आहे. मात्र कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता क्रियाशील नाहीत. तक्रारी करुन निधी नाहीच्या नावावर केवळ लिपापोती केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केला आहे. ओवारा प्रकल्पाचा एक कालवा वळद, सोनेखारी या परिसरातील जवळपास एक हजार एकर शेतीला सिंचन करतो. मात्र मागील दोनतीन वर्षापासून कालव्याला पडलेल्या भेगांमुळे शेतीपर्यंत पाणी जात नाही. याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या कालव्याला उन्हाळ्यात रबीकरिता पाणी दिला जातो. मात्र दुसरा असलेला कालवा त्याच सोनेखारी, वळद व परिसरातील गावांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीला सिंचन करण्यात अपयशी ठरला आहे. कालव्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यांना बुजविण्यात किंवा डागडुजी करुन शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता कार्यकारी अभियंता गेडाम व शाखा अभियंता धपाडे यांनी कोणतेच प्रयत्न चालविले नाही. उलट निधी नसल्याचे सांगून चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे भारी धान पाण्याअभावी मरणाच्या तयारीत आहेत. यात दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केली. या कालव्याला लागून कटंगटोला हे गाव असून येथील अपंग शेतकरी लाडकू ठाकरे यांची तीन एकर शेती पाण्याने मरत आहे. लाडकू ठाकरेला फक्त एक हात असून एकाच हाताने फुटलेली कालव्याची पाळ जीव धोक्यात घालून मुलासोबत तयार केली व शेतीपर्यंत पाणी नेण्याचे रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. मात्र कालव्याला पाणी कमी येत असल्याने वळद, सोनेखारी, कटंगटोला या गावांना पाणी चढत नाही. अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र पूर्णपणे त्यांनी डोळेझाक केली आहे. हातात आलेले पीक पाण्याअभावी जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी किशोर रहांगडाले, जियालाल पंधरे व नोहरलाल चौधरी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)