शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भारी धानपीक मृत्यूशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 02:57 IST

ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे.

शेतकरी चिंतातूर : ओवारा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता व शाखा अभियंत्याचा प्रतापआमगाव : ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे. मागील एक वर्षापासून कालव्यांना पडलेल्या भेगा बुजविण्यात न आल्याने भारीधान एका पाण्यासाठी मृत्यूश्येवर झुंज देत आहे. मात्र कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता क्रियाशील नाहीत. तक्रारी करुन निधी नाहीच्या नावावर केवळ लिपापोती केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केला आहे. ओवारा प्रकल्पाचा एक कालवा वळद, सोनेखारी या परिसरातील जवळपास एक हजार एकर शेतीला सिंचन करतो. मात्र मागील दोनतीन वर्षापासून कालव्याला पडलेल्या भेगांमुळे शेतीपर्यंत पाणी जात नाही. याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या कालव्याला उन्हाळ्यात रबीकरिता पाणी दिला जातो. मात्र दुसरा असलेला कालवा त्याच सोनेखारी, वळद व परिसरातील गावांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीला सिंचन करण्यात अपयशी ठरला आहे. कालव्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यांना बुजविण्यात किंवा डागडुजी करुन शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता कार्यकारी अभियंता गेडाम व शाखा अभियंता धपाडे यांनी कोणतेच प्रयत्न चालविले नाही. उलट निधी नसल्याचे सांगून चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे भारी धान पाण्याअभावी मरणाच्या तयारीत आहेत. यात दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केली. या कालव्याला लागून कटंगटोला हे गाव असून येथील अपंग शेतकरी लाडकू ठाकरे यांची तीन एकर शेती पाण्याने मरत आहे. लाडकू ठाकरेला फक्त एक हात असून एकाच हाताने फुटलेली कालव्याची पाळ जीव धोक्यात घालून मुलासोबत तयार केली व शेतीपर्यंत पाणी नेण्याचे रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. मात्र कालव्याला पाणी कमी येत असल्याने वळद, सोनेखारी, कटंगटोला या गावांना पाणी चढत नाही. अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र पूर्णपणे त्यांनी डोळेझाक केली आहे. हातात आलेले पीक पाण्याअभावी जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी किशोर रहांगडाले, जियालाल पंधरे व नोहरलाल चौधरी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)