शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

तलावातील गाळ काढून दुरु स्तीची कामे करणार

By admin | Updated: June 2, 2017 01:24 IST

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

राजकुमार बडोले : शिवार संवाद सभेतून मजुरांशी संवादलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातील ४०० तलावांतील गाळ यावर्षी काढण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील दोन हजार तलावांतील गाळ काढून त्याच्या दुरु स्तीची कामे करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या तलाव खोलीकरणाच्या कामाला पालकमंत्री बडोले यांनी नुकतीच भेट देवून शिवार संवाद सभेतून मजुरांशी संवादसाधला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पं.स. सभापती कविता रंगारी, जि.प. सदस्य शीला चव्हाण, पं.स. सदस्य राजेशकठाणे, सरपंच शारदा किरसान, सामाजिक कार्यकर्ते विलास चव्हाण, चेतन वडगाये, गटविकास अधिकारी लाकडे, सहायक पोलीस निरिक्षक केशव वाभळे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले म्हणाले, अडीच वर्षाच्या काळात राज्य शासनाने ११ हजार ५५ कोटी रु पये शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले आहे. पीक विम्यात सहा हजार ७३९ कोटी रूपये शेतकऱ्यांना दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात सुध्दा जलयुक्तमधून मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. पुढेही यातून कामे करून राज्य दुष्काळमुक्त करून टंचाई निवारण, सिंचनाची सुविधा व बेरोजगारांच्या हातांना कामे देण्यात येतील. येत्या दोन वर्षात सर्वांना घरे या अंतर्गतरमाई घरकूल योजना व प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत घरे देण्यात येतील. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.धान खरेदी केंद्रावर विक्र ी केलेल्या धानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे सांगून बडोले म्हणाले, शेतकऱ्यांसाठी खताचा तुटवडा पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आली. शेतमजुरांचे जीवन कसे चांगले होईल, त्यांना घरे कसे देता येईल, याचे नियोजनसुध्दा करण्यात आले आहे.मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत या परिसरातील जास्तीत जास्त गावे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याभागातील तलावांचा गाळ काढून त्याचे पुनरूज्जीवन करण्यात येईल. पुरका तलावाचे प्रकल्पात रूपांतर करण्यासाठी त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल. ज्या तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस मिळालेला नाहीत्यांना त्वरित बोनस देण्याची कार्यवाही करण्यात येईल. या गावाच्या परिसरात वन विभागाकडून तयारकरण्यात आलेले पाच वन तलाव डव्वा येथील जैवविविधता समितीकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तलावाच्या खोलीकरणाच्या कामावर असलेल्या मजुरांनी विविध समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. त्याची सोडवणूक करण्याबाबत त्यांनी शब्द दिला. यावेळी जवळपास २०० मजूर उपस्थित होते. विलास चव्हाण यांनी डव्वा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना प्रास्ताविकातून अवगत करून दिले. उपस्थितांचे आभार चेतन वडगाये यांनी मानले.सर्व धान्य दुकाने होणार आॅनलाईनधान खरेदी केंद्रावर एकरी २० क्विंटल धान विकता येणार आहे. धानाचीआणखी उत्पादकता वाढून ती एकरी ४० क्विंटलपर्यंत कशी जाईल, याचे सुध्दा नियोजन कृषी विभागाच्यामाध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. सामान्य माणसांचे प्रश्न देखील सोडविण्यात येतील. स्वस्त धान्य दुकानातून होणारा काळाबाजार थांबूनपारदर्शकता आणून ही सर्व धान्य दुकाने आॅनलाईन करण्यात येतील. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. धानाची वेळीच भरडाई करु न तो स्वस्त धान्यदुकानातून लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा तांदूळ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.