शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हावासीयांसाठी ‘हॅप्पी सॅटरडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : मागील दोन-अडीच महिने कहर केल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरत आहे. यामुळेच आता बाधितांची संख्या खालावत चालली ...

गोंदिया : मागील दोन-अडीच महिने कहर केल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरत आहे. यामुळेच आता बाधितांची संख्या खालावत चालली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात केवळ १४ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० मार्च रोजी जिल्ह्यात १० बाधितांची नोंद घेण्यात आली होती. म्हणजेच, सुमारे ८५ दिवसांनी जिल्ह्यात शनिवारी सर्वात कमी बाधित आढळून आल्याने जिल्हावासीयांसाठी ‘हॅप्पी सॅटरडे’च ठरला.

जानेवारी महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोके वर काढले होते. नागपूरपासून याची सुरुवात झाली व हळूहळू जिल्हाही त्याच्या विळख्यात आला होता. मार्च महिना अर्धा निघाल्यानंतर कोरोनाने आपले पाय पसरले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला होरपळून काढले होते. त्याची झळ आतापर्यंत सहन करावी लागत असून, नवीन बाधितांची संख्या आजही खाली-वर होत आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरत आहे हे नक्की. परिणामी जिल्ह्यातील दैनंदिन जीवन सुरळीत होताना दिसत आहे. असे असतानाच शनिवारी (दि.५) जिल्ह्यात फक्त १४ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. मागील आकडेवारी बघितली असता १० मार्च रोजी जिल्ह्यात १० बाधितांची नोंद घेण्यात आल्याचे दिसते. म्हणजेच, तब्बल सुमारे ८५ दिवसांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात एवढी कमी आकडेवारी नोंदविता आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीत सातत्याने घट होत असल्याचे बघून सर्वांनाच दिलासा मिळत आहे. अशात शनिवारचा (दि.५) हा दिवस जिल्हावासीयांसाठी नक्कीच ‘हॅप्पी सॅटरडे’ ठरला.

----------------------------------

२२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

शनिवारी जिल्ह्यात १४ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असल्याने जिल्हावासीयांच्या डोक्यावरील टेन्शन आता हळूहळू कमी होत चालले आहे. सुमारे ३ महिने कोरोनाच्या दडपणात असल्याने कित्येकांच्या मनात आजही एक दहशत निर्माण झाली आहे. मात्र शनिवारची आकडेवारी सर्वांनाच सुखद ठरली. त्यात २२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आणखीच दुधात साखर पडली आहे.

--------------------------

नियम पाळा, कोरोना टाळा

कोरोनाची दुसरी लाट आता आपल्या जिल्ह्याचा पिच्छा सोडत असल्याचे दिसत आहे. यात नागरिकांनी दिलेले समर्थन हेसुद्धा त्याला कारणीभूत आहे. मात्र, यापुढेही आपल्या जिल्ह्याला कोरोनाच्या कचाट्यातून दूर ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी नियम पाळण्याची गरज आहे.