शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

हाताला काम नाही, राबण्यासाठी जमीन नाही

By admin | Updated: December 13, 2014 22:41 IST

नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प घोषीत त्यानंतर या प्रकल्पातील बाजार झोनमध्ये येत असलेल्या गावांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी धावपळ केली. कालीमाटी, कवलेवाडा,

सुखदेव कोरे - सौंदड/रेल्वेनवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प घोषीत त्यानंतर या प्रकल्पातील बाजार झोनमध्ये येत असलेल्या गावांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी धावपळ केली. कालीमाटी, कवलेवाडा, झनकारगोंदी आदी गावांचे पुनर्वसन सौंदड येथे नवीन वसाहतीत करण्यात आले. यावेळी या नागरिकांना मोठमोठ्या आश्वासनांचे स्वप्न दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आता या प्रकल्पग्रस्तांची स्थिती ‘तेलही गेले, तूपही गेले...’ अशी झाली आहे.या गावाकऱ्यांची थोडीथोडकी असलेली शेतजमीनही प्रकल्पात गेल्यानंतर त्यांच्या हाताला आता काम राहिलेले नाही. त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन देऊ केली होती. त्यासाठी सौंदड परिसरातील झुडूपी जंगलाचा भाग प्रतिकुटुंब १ हेक्टर देण्यासाठी मोजमापही सुरू केले होते. पण गावकऱ्यांनी यासाठी मज्जाव केला. तेव्हापासून ही कार्यवाही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे सर्वांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.आधी प्रतीव्यक्ती १० लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तिला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात येईल या अमिषाला आदिवासी नागरिक बळी पडले. पण तसे झालेच नाही. मालीमाटी या गावाचे सन २०११-१२ मध्ये सर्वप्रथम पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी पुनर्वसनाचे २ लाख २१ हजार रुपये पुनर्वसनधारकांच्या रकमेतून कपात करण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये कवलेवाडा या गावाचे पुनर्वसन झाले. १० लाखाच्या पॅकेजमधून ३ लाख रुपये कपात करुन पुनर्वसनधारकांच्या खात्यांवर ६ लाख रुपये जमा केले. पुनर्वसनधारकांना शेतीचा मोबदला म्हणून प्रतीएकर १ लाख ६५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु प्रत्यक्षात प्रती एकर फक्त ६५ हजार देण्यात आले. विशेष म्हणजे सौंदड येथे शेतजमिनीचे भाव ५ ते ६ लाख रुपये प्रतीएकर आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ५ ते ६ एकर शेतजमिन होती. त्याला ३.५० लाख ते ४ लाख रुपये मिळाले. या एवढ्याशा रकमेत तो एकही एकर शेती विकत घेऊ शकत नाही. मात्र मुलांना नोकरीत समाविष्ट ही केले नाही किंवा १० लाख रुपयांच्या पॅकेजमध्ये समाविष्ठ केले नाही. या पुनर्वसनधारकांना वनशेतीसाठी जमीन देण्यासाठी सौंदड येथील ३२ हेक्टर आरमध्ये प्लान्टेशन लावलेल्या जागेत उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग यांनी केंद्र शासनाची मंजुरी न घेताच प्रत्येक पुनर्वसनधारकांना एक हेक्टर जागा मोजून देत असताना सौंदड येथील नागरिकांनी त्यांना अडविले. आता हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे बेरोजगार होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.