शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे ...

गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे रुग्णांच्या शरीराची हानी होत आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने अनेक रुग्णांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या औषधीमुळे जीवनसत्त्व व प्रथिने यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना आता केस गळतीचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही विषाणूशी लढताना शरीरातील विविध जीवनसत्त्वाची हानी होते. कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करते. कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे ही तीव्र असल्याने तसेच ती औषधे अधिक काळ घ्यावी लागत असल्याने त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.

......................

कोविडनंतर ३ महिन्यांनी गळू लागतात केस

कोरोनाशी लढा देताना वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे विविध प्रकारचे जीवनसत्त्व नष्ट होतात. त्याचा विपरित परिणाम मानव शरीरावर होत असतो. कोविडची औषधी घेणाऱ्या लोकांची तीन महिन्यानंतर हळूहळू केस गळू लागतात. प्रथिने मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ही प्रथिने किंवा जीवनसत्त्वे नैसर्गिकदृष्ट्या घेतली तर ते आरोग्यासाठी लाभदायी आहे.

.............

हे करा...

-आहारात अधिक प्रथिने असलेली जसे अंडी, मोड आलेले कडधान्य, दूध यांचा वापर करावा.

- शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी संपूर्ण आहाराची गरज असते त्यासाठी संपूर्ण आहार घ्यावा.

- कोरोनामुळे शरीरात खूप थकवा येतो यासाठी पुरेपूर झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी, शरीरात पाण्याची पातळी योग्य राहील याची खबरदारी घ्यावी.

- शरीरात क व ड जीवनसत्त्व जातील असा आहार घ्यावा.

.......................

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...

- कोरोना बरा झाल्यानंतर कोरोना काळात केलेल्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट होते.

- काही रुग्णांना कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात थकवा येतो. श्वसनात अडचण होते. खोकला होत राहतो.

- प्रथिनांच्या कमतरतेमुळे काही लोकांचे केस गळतात. त्यामुळे काही लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.

- घरगुती उपचार काहीवेळ घातक ठरत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे मत आहे.

..........................

कोट

कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे व कोरोना विषाणूशी लढताना होणाऱ्या जीवनसत्त्वाची हानी, प्रथिनांची कमतरता यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो. यासाठी भरपूर पाणी प्या व प्रथिने युक्त पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे.

- डॉ. नोव्हील ब्राह्मणकर, गोंदिया.