शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे ...

गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे रुग्णांच्या शरीराची हानी होत आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने अनेक रुग्णांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या औषधीमुळे जीवनसत्त्व व प्रथिने यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना आता केस गळतीचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही विषाणूशी लढताना शरीरातील विविध जीवनसत्त्वाची हानी होते. कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करते. कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे ही तीव्र असल्याने तसेच ती औषधे अधिक काळ घ्यावी लागत असल्याने त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.

......................

कोविडनंतर ३ महिन्यांनी गळू लागतात केस

कोरोनाशी लढा देताना वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे विविध प्रकारचे जीवनसत्त्व नष्ट होतात. त्याचा विपरित परिणाम मानव शरीरावर होत असतो. कोविडची औषधी घेणाऱ्या लोकांची तीन महिन्यानंतर हळूहळू केस गळू लागतात. प्रथिने मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ही प्रथिने किंवा जीवनसत्त्वे नैसर्गिकदृष्ट्या घेतली तर ते आरोग्यासाठी लाभदायी आहे.

.............

हे करा...

-आहारात अधिक प्रथिने असलेली जसे अंडी, मोड आलेले कडधान्य, दूध यांचा वापर करावा.

- शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी संपूर्ण आहाराची गरज असते त्यासाठी संपूर्ण आहार घ्यावा.

- कोरोनामुळे शरीरात खूप थकवा येतो यासाठी पुरेपूर झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी, शरीरात पाण्याची पातळी योग्य राहील याची खबरदारी घ्यावी.

- शरीरात क व ड जीवनसत्त्व जातील असा आहार घ्यावा.

.......................

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...

- कोरोना बरा झाल्यानंतर कोरोना काळात केलेल्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट होते.

- काही रुग्णांना कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात थकवा येतो. श्वसनात अडचण होते. खोकला होत राहतो.

- प्रथिनांच्या कमतरतेमुळे काही लोकांचे केस गळतात. त्यामुळे काही लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.

- घरगुती उपचार काहीवेळ घातक ठरत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे मत आहे.

..........................

कोट

कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे व कोरोना विषाणूशी लढताना होणाऱ्या जीवनसत्त्वाची हानी, प्रथिनांची कमतरता यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो. यासाठी भरपूर पाणी प्या व प्रथिने युक्त पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे.

- डॉ. नोव्हील ब्राह्मणकर, गोंदिया.