शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे ...

गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे रुग्णांच्या शरीराची हानी होत आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने अनेक रुग्णांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या औषधीमुळे जीवनसत्त्व व प्रथिने यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना आता केस गळतीचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही विषाणूशी लढताना शरीरातील विविध जीवनसत्त्वाची हानी होते. कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करते. कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे ही तीव्र असल्याने तसेच ती औषधे अधिक काळ घ्यावी लागत असल्याने त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.

......................

कोविडनंतर ३ महिन्यांनी गळू लागतात केस

कोरोनाशी लढा देताना वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे विविध प्रकारचे जीवनसत्त्व नष्ट होतात. त्याचा विपरित परिणाम मानव शरीरावर होत असतो. कोविडची औषधी घेणाऱ्या लोकांची तीन महिन्यानंतर हळूहळू केस गळू लागतात. प्रथिने मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ही प्रथिने किंवा जीवनसत्त्वे नैसर्गिकदृष्ट्या घेतली तर ते आरोग्यासाठी लाभदायी आहे.

.............

हे करा...

-आहारात अधिक प्रथिने असलेली जसे अंडी, मोड आलेले कडधान्य, दूध यांचा वापर करावा.

- शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी संपूर्ण आहाराची गरज असते त्यासाठी संपूर्ण आहार घ्यावा.

- कोरोनामुळे शरीरात खूप थकवा येतो यासाठी पुरेपूर झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी, शरीरात पाण्याची पातळी योग्य राहील याची खबरदारी घ्यावी.

- शरीरात क व ड जीवनसत्त्व जातील असा आहार घ्यावा.

.......................

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...

- कोरोना बरा झाल्यानंतर कोरोना काळात केलेल्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट होते.

- काही रुग्णांना कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात थकवा येतो. श्वसनात अडचण होते. खोकला होत राहतो.

- प्रथिनांच्या कमतरतेमुळे काही लोकांचे केस गळतात. त्यामुळे काही लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.

- घरगुती उपचार काहीवेळ घातक ठरत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे मत आहे.

..........................

कोट

कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे व कोरोना विषाणूशी लढताना होणाऱ्या जीवनसत्त्वाची हानी, प्रथिनांची कमतरता यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो. यासाठी भरपूर पाणी प्या व प्रथिने युक्त पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे.

- डॉ. नोव्हील ब्राह्मणकर, गोंदिया.