शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

पाण्यासाठी पाहुणे माकड गावांत

By admin | Updated: May 27, 2016 01:36 IST

सर्वत्र उन्हाचा टाहो, सगळीकडे तेजोमय सूर्याची तीव्र किरणे आग ओकत आहेत. अशावेळी माणवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे.

बाराभाटी : सर्वत्र उन्हाचा टाहो, सगळीकडे तेजोमय सूर्याची तीव्र किरणे आग ओकत आहेत. अशावेळी माणवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. तसेच इतरही प्राण्यांना पाण्याची गरज आहे, असे येरंडी येथे दिसून आले. पिण्याच्या पाण्यासाठी भटकलेली माकडे चक्क पाहुण्यासारखे घरासमोर आल्याचे चित्र येथे दिसून येते. माणसाप्रमाणे माकडेसुध्दा प्राणीच आहेत. माणवाची उत्पत्ती करणारे हेच प्राणी आहेत. म्हणून याचा संबंध मानवाशी भावनीक होवून जातो. सकाळी १० वाजता येरंडीच्या लगत असणाऱ्या अमराई जवळील घरासमोरच चक्क अर्धा तास ७-८ बादल्यांनी १५ माकडांना पाणी पाजून नाती जोडण्याचा उपक्रम विशाल रामचंद्र गेडाम यांनी जपला. यांना मदत म्हणून वयाची कुठलीही काळजी न करता व चमकणारी उन्ह सहन करीत ‘प्या रे प्या पाणी’ असा स्वर गुणगुणत सत्यभान दयाराम रंगारी यांनी पाणी पाजले. असा भावनाशील उपक्रम पाहून डोळ्यात चमक निर्माण झाली व १९२७ ला चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाली. त्यांनी मानवाला पाणी पाजले आणि मानवांची उत्पत्ती करणारा प्राण्यास मानवाने पाणी पाजले. असे चित्र पाहून मन हेलावून गेले व अंतर्मनात साठवण्याजोगा प्रसंग या नागरिकांच्या हातून घडल्याचे त्यांना समाधान झाले. अलीकडे महाराष्ट्राचा बराच भाग तहानलेला आहे. मानव, प्राणी, पक्षी-पशू तहानेने व्याकूळ दिसतात. पाणी न मिळताच सदर प्राणीमात्रांना कधी-कधी प्राणसुध्दा सोडावा लागतो. मिळेल त्या ठिकाणचे पाणी प्यावे लागते. तहानलेल्या मनात असा प्रसंग नक्की घर करून बसतो. सर्व प्राणीमात्रांनी जीवन जगाव, असा गांभीर्यबोध यांनी दिला. अनेक नागरिकांकडे कधीच वेळ नसते. पण स्वत: काम सोडून पाहुण्या माकडांना पाणी पाजण्याचे काम प्रथम परिसरात पहायला मिळते. अमराईत आंबे नाहीत, पण जिवंत राहण्यासाठी काही तरी खावू अन् दिवस काढू, असा प्रसंग माकडांसमोर असेल. पण हिंमत न हारता पाण्यावरच दिवसे काढता येतील, असा बेताने गावाकडे पाहुणे म्हणून ही माकडे आलीत. सोबत स्वत:च्या पिलांनाही आणले.