शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पाण्यासाठी पाहुणे माकड गावांत

By admin | Updated: May 27, 2016 01:36 IST

सर्वत्र उन्हाचा टाहो, सगळीकडे तेजोमय सूर्याची तीव्र किरणे आग ओकत आहेत. अशावेळी माणवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे.

बाराभाटी : सर्वत्र उन्हाचा टाहो, सगळीकडे तेजोमय सूर्याची तीव्र किरणे आग ओकत आहेत. अशावेळी माणवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. तसेच इतरही प्राण्यांना पाण्याची गरज आहे, असे येरंडी येथे दिसून आले. पिण्याच्या पाण्यासाठी भटकलेली माकडे चक्क पाहुण्यासारखे घरासमोर आल्याचे चित्र येथे दिसून येते. माणसाप्रमाणे माकडेसुध्दा प्राणीच आहेत. माणवाची उत्पत्ती करणारे हेच प्राणी आहेत. म्हणून याचा संबंध मानवाशी भावनीक होवून जातो. सकाळी १० वाजता येरंडीच्या लगत असणाऱ्या अमराई जवळील घरासमोरच चक्क अर्धा तास ७-८ बादल्यांनी १५ माकडांना पाणी पाजून नाती जोडण्याचा उपक्रम विशाल रामचंद्र गेडाम यांनी जपला. यांना मदत म्हणून वयाची कुठलीही काळजी न करता व चमकणारी उन्ह सहन करीत ‘प्या रे प्या पाणी’ असा स्वर गुणगुणत सत्यभान दयाराम रंगारी यांनी पाणी पाजले. असा भावनाशील उपक्रम पाहून डोळ्यात चमक निर्माण झाली व १९२७ ला चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाली. त्यांनी मानवाला पाणी पाजले आणि मानवांची उत्पत्ती करणारा प्राण्यास मानवाने पाणी पाजले. असे चित्र पाहून मन हेलावून गेले व अंतर्मनात साठवण्याजोगा प्रसंग या नागरिकांच्या हातून घडल्याचे त्यांना समाधान झाले. अलीकडे महाराष्ट्राचा बराच भाग तहानलेला आहे. मानव, प्राणी, पक्षी-पशू तहानेने व्याकूळ दिसतात. पाणी न मिळताच सदर प्राणीमात्रांना कधी-कधी प्राणसुध्दा सोडावा लागतो. मिळेल त्या ठिकाणचे पाणी प्यावे लागते. तहानलेल्या मनात असा प्रसंग नक्की घर करून बसतो. सर्व प्राणीमात्रांनी जीवन जगाव, असा गांभीर्यबोध यांनी दिला. अनेक नागरिकांकडे कधीच वेळ नसते. पण स्वत: काम सोडून पाहुण्या माकडांना पाणी पाजण्याचे काम प्रथम परिसरात पहायला मिळते. अमराईत आंबे नाहीत, पण जिवंत राहण्यासाठी काही तरी खावू अन् दिवस काढू, असा प्रसंग माकडांसमोर असेल. पण हिंमत न हारता पाण्यावरच दिवसे काढता येतील, असा बेताने गावाकडे पाहुणे म्हणून ही माकडे आलीत. सोबत स्वत:च्या पिलांनाही आणले.