उषाताई मेंढे यांचे आवाहन : राष्ट्रीय स्वच्छता व गाडगेबाबा अभियानाचे उद्घाटन गोंदिया : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियानात देखील लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेचा उपक्रम राबवावा, नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी (ता.२९) राष्ट्रीय स्वच्छता अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या संयुक्त उद्घाटन सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण समितीचे सभापती देवराज वडगाये, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, जि.प.सदस्य आणि राष्ट्रवादीचे गटनेता गंगाधर परशुरामकर, दुर्गा तिराले, सुरेश हर्षे, किशोर तरोणे, कमलेश्वरी लिल्हारे, श्यामकला पाचे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक माहिती, शिक्षण आणि संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर यांनी केले. संचालन समाजशास्त्र तज्ज्ञ दिशा मेश्राम यांनी तर आभार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अधीक्षक एच.आर. गौतम, प्रभारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा लेखाधिकारी जितेंद्र येरपुडे, माहिती शिक्षण आणि संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ बी.ओ. पटले, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तृप्ती साकुरे, मूल्यमापन व सनियंत्रण तज्ज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटिंग, पाणी गुणवत्ता सल्लागार मुकेश त्रिपाठी, सचिन रोढी, उमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)
ग्रामपंचायतींनी स्वच्छता उपक्रम राबवावेत
By admin | Updated: October 1, 2015 02:03 IST