शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

धान खरेदी संस्था फाडत आहेत इमारत फंडच्या नावाखाली पावत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. सध्या रब्बीतील धान खरेदी सुरू असून, ...

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. सध्या रब्बीतील धान खरेदी सुरू असून, या संस्था धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून संस्था इमारत फंडाच्या नावावर प्रती शेतकरी ७०० ते १,००० हजार रुपयांच्या पावत्या फाडत आहेत. मात्र, याकडे सध्या कुणाचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे.

मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने गाेदाम पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. मात्र, गोदाम भाड्याने घेऊन व काही शाळा अधिग्रहीत करून धान खरेदीला सुरुवात करण्यात आली. बऱ्याच संस्थांनी गोदाम भाड्याने घेतले असून, त्याचे भाडे मात्र अप्रत्यक्ष रूपात शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. हा प्रकार सर्वाधिक देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था धानाची विक्री करणाऱ्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून इमारत फंडाच्या नावाखाली सर्रासपणे पावत्या फाडत आहे. याची पावतीही शेतकऱ्यांना देत आहे. नियमानुसार शेतकऱ्यांकडून इमारत फंडाच्या नावाखाली नेमके किती पैैसे घेण्याचा अधिकार आहे, हेही स्पष्ट नाही. विशेष म्हणजे, इमारत फंडाच्या नावाखाली अशा पावत्या फाडण्यासाठी संबंधित संस्थेला ठराव पारित करावा लागतो. यानंतर, या ठरावाची प्रत जिल्हा सहकार निबंधक कार्यालयाकडे जमा करावी लागते. त्यानंतरच अशा प्रकारची पावती फाडता येत असल्याचे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आधीच नैसर्गिक संकटे आणि धान खरेदीच्या बराच काळ चाललेल्या गोंधळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता धान खरेदी करणाऱ्या संस्थांकडून इमातर फंडाच्या नावाखाली सातशे ते एक हजार रुपये वसूल केले जात असल्याने, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

.............

चूक शासनाची भुर्दंड आम्हाला का?

मागील वर्षी खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने रब्बीत गोदामे रिकामी झाली नाहीत. त्यामुळे खरेदीसाठी संस्थांना भाड्याने गोदामे घ्यावी लागली. मात्र, संस्था याचे भाडे शेतकऱ्यांकडून वसूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. चूक शासनाची, मग भुर्दंड आम्हाला का? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे, तसेच याची लेखी तक्रारही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे केली आहे.