शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी संस्था फाडत आहेत इमारत फंडच्या नावाखाली पावत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. सध्या रब्बीतील धान खरेदी सुरू असून, ...

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. सध्या रब्बीतील धान खरेदी सुरू असून, या संस्था धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून संस्था इमारत फंडाच्या नावावर प्रती शेतकरी ७०० ते १,००० हजार रुपयांच्या पावत्या फाडत आहेत. मात्र, याकडे सध्या कुणाचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे.

मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने गाेदाम पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. मात्र, गोदाम भाड्याने घेऊन व काही शाळा अधिग्रहीत करून धान खरेदीला सुरुवात करण्यात आली. बऱ्याच संस्थांनी गोदाम भाड्याने घेतले असून, त्याचे भाडे मात्र अप्रत्यक्ष रूपात शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. हा प्रकार सर्वाधिक देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था धानाची विक्री करणाऱ्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून इमारत फंडाच्या नावाखाली सर्रासपणे पावत्या फाडत आहे. याची पावतीही शेतकऱ्यांना देत आहे. नियमानुसार शेतकऱ्यांकडून इमारत फंडाच्या नावाखाली नेमके किती पैैसे घेण्याचा अधिकार आहे, हेही स्पष्ट नाही. विशेष म्हणजे, इमारत फंडाच्या नावाखाली अशा पावत्या फाडण्यासाठी संबंधित संस्थेला ठराव पारित करावा लागतो. यानंतर, या ठरावाची प्रत जिल्हा सहकार निबंधक कार्यालयाकडे जमा करावी लागते. त्यानंतरच अशा प्रकारची पावती फाडता येत असल्याचे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आधीच नैसर्गिक संकटे आणि धान खरेदीच्या बराच काळ चाललेल्या गोंधळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता धान खरेदी करणाऱ्या संस्थांकडून इमातर फंडाच्या नावाखाली सातशे ते एक हजार रुपये वसूल केले जात असल्याने, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

.............

चूक शासनाची भुर्दंड आम्हाला का?

मागील वर्षी खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने रब्बीत गोदामे रिकामी झाली नाहीत. त्यामुळे खरेदीसाठी संस्थांना भाड्याने गोदामे घ्यावी लागली. मात्र, संस्था याचे भाडे शेतकऱ्यांकडून वसूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. चूक शासनाची, मग भुर्दंड आम्हाला का? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे, तसेच याची लेखी तक्रारही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे केली आहे.