शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

स्वदेशी खेळांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी

By admin | Updated: December 31, 2015 01:53 IST

स्वदेशी खेळ हे गोंदिया आणि भंडारा जिल्हापुरते मर्यादित राहिले. खेळाडूंना पुढील शिक्षणात किंवा स्पर्धात्मक कार्यात याचा लाभ मिळावा...

जि.प. सदस्य मनोज डोंगरे : मांडवी येथे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे उद्घाटनकाचेवानी : स्वदेशी खेळ हे गोंदिया आणि भंडारा जिल्हापुरते मर्यादित राहिले. खेळाडूंना पुढील शिक्षणात किंवा स्पर्धात्मक कार्यात याचा लाभ मिळावा याकरिता शासन स्तरावरून प्रमाणपत्राला महत्त्व असावे, अशी मागणी असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे, असे मत कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी व्यक्त केले. तिरोडा तालुक्यातील मांडवी येथे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालेय मुलांना स्वदेशी खेळाचा लाभ मिळतो ही आनंदाची बाब आहे. खेळातून विद्यार्थ्यांचे मन मोकळे होते व शारीरिक आरोग्य लाभते. वर्षभर अभ्यासात मन लागले असल्याने विद्यार्थी कंटाळून जातात. एक प्रकारचा मुलांच्या बुध्दीला जंग लागल्यासारखे होते. खेळाच्या माध्यमाने अभ्यास बाजूला सारून मोकळ्या मनाने खेळात सहभागी झाल्याने अभ्यासाचा तणाव नाहीसा होतो आणि काही काळाकरिता त्यांचे मन मोकळा होते. यातून विद्यार्थी काही प्रमाणात तणाव मुक्त होतात. असे असले तरी आजच्या परिस्थितीत स्वदेशी खेळांबाबत पालकापासून तर शिक्षकापर्यंत विरोधाभास दिसून येत आहे. पालकवर्ग तर खेळात भाग घेण्यास थांबवत आहेत. याला कारण असे की, स्वदेशी खेळात सहभागी होणाऱ्या मुलांना शासनस्तरावरून किंवा जि.प. स्तरावरून कसल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारण्याची तरतूद नाही. मुलांना साधे प्रमाणपत्र दिले जात नाही. प्रमाणपत्र मिळत असले तरी त्या प्रमाणपत्राचे महत्व कुठेही राहत नाही, ही एक शोकांतिकाच आहे. हा मुद्दा आपण जि.प.मध्ये उपस्थित करून विद्यार्थ्यांना याकरिता काही तरी करता येईल का? अशी विचारणा करून प्रयत्न करायला लावू, असे मत जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात स्वदेशी खेळांना शिक्षकवर्गसुध्दा विरोध दर्शवीत आहेत. यात स्वदेशी खेळाच्या वेळी ग्रामीण भागात होणाऱ्या सामन्यात शिक्षकाला मारहाण, अपमानित करणे, सुरक्षेचा अभाव, पालकांचा जबाबदारीतून पळ काढणे या समस्या प्रमुख आहेत. खेळादरम्यान विद्यार्थ्यांना नुकसानीच्यावेळी त्याची भरपाई करण्यास आणि जबाबदारी शिक्षकावर थोपविण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकवर्ग स्वदेशी खेळांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.स्वदेशी खेळांची जबाबदारी जि.प. आणि राज्य सरकारने स्वीकारायला हवी. खेळाकरिता शालेयस्तरावर वार्षिक २५ हजार रुपयांचा स्वतंत्र निधी आणि केंद्रस्तरावरील खेळांकरिता ५० ते एक लाख रुपयांचा निधी द्यायला हवे. शासन आणि जिल्हा परिषद स्वदेशी खेळांची जबाबदारी आणि लागणाऱ्या खर्चाची भरपाई स्वीकारण्यास तयार नसेल तर या खेळांचा आपणसुध्दा विरोध करणार, असे डोंगरे म्हणाले. (वार्ताहर)