शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन न्याय देणार?

By admin | Updated: January 19, 2017 01:27 IST

आदिवासी सहकारी संस्थेतून ४० हजार रु. कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्रस्त शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विहीरीत

 देवरी : आदिवासी सहकारी संस्थेतून ४० हजार रु. कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्रस्त शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. परंतु शासनाकडून मृतक शेतकऱ्याच्या परिवाराला कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्याने मृतक शेतकऱ्याच्या परिवार आर्थिक संकटात सापडला असून परिवाराला शासन न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांची आजारी पत्नी कलावती यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील फुटाणा या गावातील शेतकरी मुरारी श्रावण राऊत (६६) यांनी २५ आॅक्टोबर २०१६ रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. मुरारी राऊत यांनी आदिवासी सहकारी संस्थेतून शेतीकरीता ४० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. दुसरीकडे मागील २० वर्षापासून पत्नी कलावती ब्लडप्रेशर व डायबीटीजमुळे बिमार होती. तिला नेहमी गोंदियाला उपचाराकरीता न्यायला खुप पैशाचा खर्च होत होता. शेतात पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने व घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी या चिंतेने ग्रस्त मुरारी श्रावण राऊत यांनी २३ आॅक्टोबरला घर सोडले. नातेवाईकांकडे शोध घेऊन ही पत्ता न लागल्याने घर कुटूंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशन चिचगडला तक्रार केली होती. २५ आॅक्टोबरला मुरारीचे प्रेत गावातीलच नुतन बन्सोड यांच्या शेतातील विहीरीत सापडले. मृतक शेतकऱ्याकडे सोसायटीचे कर्ज होते व कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा प्रशासनीक अधिकारी यांचेकडे देण्यात आले.परंतु न्याय मिळत नसल्याने मृतकाच्या पत्नी कलावती यांनी आमदार व पालकमंत्र्याकडे निवेदन सादर करून शेतकरी आत्महत्या निधीतून शासनाकडून मदत व शेतीवर घेण्यात आलेले कर्ज माफ करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला शासन तातडीने मदत करीत असते. परंतु या मृतक परिवाराच्या सदस्यांना अजून किती वेळ वाट पाहावी लागणार असा सवाल मृतकाची पत्नी कलावती यांनी केला आहे.