शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गोरेगाव नगर पंचायत झाली टोल फ्री

By admin | Updated: June 1, 2016 02:23 IST

राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतमध्ये करण्यात आले. अनेक महिने लोटूनसुद्धा नगर पंचायतीला असुविधेचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांची सुविधा : आशिष बारेवार यांचे प्रयत्न फळालागोरेगाव : राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतमध्ये करण्यात आले. अनेक महिने लोटूनसुद्धा नगर पंचायतीला असुविधेचा सामना करावा लागत आहे. कुठे निधी नाही, तर कुठे कर्मचारी चाही, अशा स्थितीत नगरवासियांचे समाधान करणे अशक्य आहे. नगर पंचायतच्या स्थापनेपासून आजपर्यंत कामांचे शासकीय नियोजन नाही. नगरवासियांना होत असलेल्या असुविधांचा अभ्यास करून तपासणीअंती नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशीष बारेवार यांनी समस्या, तक्रारी व मार्गदर्शक सूचना नागरिकांकडून मिळाव्यात व त्वरित निराकरण व्हावे यासाठी गोरेगाव नगर पंचायत टोल फ्री क्रमांकाशी जोडून विकासाचा नवा अध्याय गोरेगावात प्रथमच सुरू केला. जिल्ह्यातील टोल फ्री क्रमांकावर सेवा देणारी ही पहिली नगर पंचायत आहे, हे विशेष.गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत १७ वार्ड असून डिसेंबर २०१५ पासून खऱ्या अर्थाने नगर पंचायतचा कारभार सुरू झाला. नगर पंचायत झाल्यापासून नगरवासियांच्या अपेक्षा गगणाला भिडल्या. पण सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासकीय मान्यतेशिवाय कोणतेही काम करता येत नसल्यामुळे १७ वार्डातील कामे ठप्प पडून आहेत. त्यामुळे नगरवासियांच्या समस्या, तक्रारी वाढतच आहेत. नगर पंचायतचे अध्यक्ष सीमा राहुल कटरे, उपाध्यक्ष आशीष बारेवार, मधुमाला साखरे, राजू टेंभुर्णीकर, निभावती धपाडे, शामली जायस्वाल, रविंद्र चन्ने, हिरवा झंझाड, चंद्ररेखा कांबळे यांनी मासिक सभा घेवून समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. नगरवासियांना सुविधा पुरविणे थांबविता येणार नाही, त्यामुळे प्रत्येक वार्डाची पाहणी करून समस्या व आवश्यक कामाची योजना तयार करून प्रशासकीय मान्यता मिळताच कामाची सुरूवात करायचे ठरविले. कामाला सुरूवात करून नगराचा विकास करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने गावातील शुद्ध पाणी पुरवठा, नाली सफाई, स्वच्छता अभियान, रस्ता दुरूस्ती, रस्त्यावर मुरूम टाकणे, गड्डे बुजविणे, पावसाचे पाणी गावाबाहेर जाण्यासाठी पाण्याचा मार्ग मोकळा करणे, शुद्ध पाणी-स्वच्छ परिसर-सक्षम आरोग्य यासाठी सर्वसामान्य फंडातून कामे करून नगरवासियांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस नगर पंचायतचे नगराध्यक्ष सीमा कटरे यांच्यासह उपाध्यक्ष आशीष बारेवार व सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला.यासाठी नगरवासियांना तक्रार, समसञया, सूचना देण्यासाठी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून नगर पंचायत विनामूल्य टोल फ्री क्रमांक (१८००२३३२५७५) यावर संपर्क साधून माहिती देण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. तक्रार मिळताच समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न नगर पंचायतकडून केला जाईल, असा विश्वास दर्शविण्यात आला आहे.