शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

‘शिक्षणाच्या हक्का’त गोंदिया राज्यात अव्वल

By admin | Updated: March 30, 2017 01:06 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील .......

विद्यार्थ्यांना लॉटरीतून मोफत प्रवेश : १,२०,४२८ जागांसाठी १,४३,७५७ अर्ज, ४५,१९९ विद्यार्थ्यांना लाभ नरेश रहिले   गोंदिया बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यातील ८ हजार २६४ शाळांमध्ये एक लाख २० हजार ४२८ जागा राखीव करण्यात आल्या. या जागांसाठी राज्यातील एक लाख ४३ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन वेळा झालेल्या सोडतीनंतर ४५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी अ‍ॅडमीशन घेतले आहे. अ‍ॅडमीशन घेण्यात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पहिल्या व दुसऱ्या लॉटरीत या बालकांना प्रवेश मिळाला. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठविण्यात आले. जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे १ लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. गोंदिया जिल्ह्याच्या १३० शाळांमध्ये ११९७ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी १ हजार ३९८ अर्ज करण्यात आले होते. त्यातील ८०४ विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन प्रवेश मिळवून घेतला. जिल्ह्यातील ६७.१७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्यामुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकात आला. त्या पाठोपाठ धुळे ६४.३७ टक्के असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकोला ६२.५५ टक्के, वर्धा ६१.०७ टक्के, अमरावती ५९.३८ टक्के, भंडारा ५८.३४ टक्के, यवतमाळ ५६.५२ टक्के, नागपूर ५६.१५ टक्के, अहमदनगर ४९.०७ टक्के, बीड ४५.६२ टक्के, पुणे ४५.५६ टक्के, उस्मानाबाद ४५.३० टक्के, नाशिक ४४.७० टक्के, नांदेड ४४.२९ टक्के, जळगाव ४३.५१ टक्के, गडचिरोली ४१.९६ टक्के, सातारा ४१.१२ टक्के, बुलढाणा ४०.५६ टक्के, वाशिम ४०.३१ टक्के, चंद्रपूर ३८.०६ टक्के, रायगड ३६.८१ टक्के, जालना ३५.९६ टक्के, लातूर ३३.२१ टक्के, औरंगाबाद ३१.३३ टक्के, परभणी २९.२५ टक्के, सोलापूर २७.४५ टक्के, हिंगोली २५.९८ टक्के, मुंबई २४.०२ टक्के, नंदुरबार २३.२३ टक्के, ठाणे २१.०० टक्के, सांगली २०.९९ टक्के, सिंधुदुर्ग २०.४० टक्के, रत्नागिरी १९.१७ टक्के, कोल्हापूर १६.०३ टक्के व पालघर ९.३५ टक्के बालकांनी प्रवेश घेतला आहे. २३ हजार ३२९ विद्यार्थ्यांना नो अ‍ॅडमिशन राज्यातील ८ हजार २६४ शाळांमध्ये एक लाख २० हजार ४२८ विद्यार्थ्यांना राखीव होत्या. आॅनलाईन पध्दतीने लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश द्याचे होते. ज्या विद्यार्थ्यांना जी शाळा मिळाली त्या शाळांत पालकांसोबत जाऊन विद्यार्थ्याचे नाव दाखल करायचे होते. राज्यातील एक लाख ४३ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. काहींनी प्रवेश घेतला तर काहींनी प्रवेश घेतला नाही. दोन वेळा झालेल्या सोडतीनंतर ४५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी अ‍ॅडमीशन घेतले आहे. जागांपेक्षा अधिक २३ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने इतक्या संख्येतील विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देता येणार नाही.