शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

हरित महाराष्ट्रात गोंदिया समृद्ध

By admin | Updated: April 10, 2017 01:08 IST

हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने देत राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला.

नरेश रहिले  गोंदियाहरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने देत राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ४७ हजार ३४३ रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यामुळे वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली होती. १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी लावलेल्या ९ लाख ६३ हजार ६०० रोपट्यांपैकी ८ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जीवंत असल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. ९३ टक्के रोपटे जीवंत असून हरित महाराष्ट्रात गोंदिया समृध्द होत आहे.गोंदिया वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि इतर यंत्रणा मिळून हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. वृक्ष लागवड करून मोकळे होणे हा नित्यक्रम राहू नये शासनाने सांगितल्यामुळे लावलेल्या रोपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी संबजित यंत्रणानी घेतली. परिणामी गोंदिया जिल्ह्यात लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी ९३ टक्के रोपटे जगले आहेत. हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र हा राज्य सरकारचा नारा गोंदियाने यशस्वी केला. वनमहोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ९ हजार ४७ हजार ३४३ वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्टे होती. परंतु उद्दीष्टांपेक्षा अधिक ९ लाख ६२ हजार ६०० रोपटे लावण्यात आले. ही लावलेली रोपटे जीवंत आहेत की मृत्यू पावली यासाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित करून माहिती मागविण्यात आली. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याने १ जानेवारी २०१७ रोजी पाहणी केल्यामुळे लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी ८ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जीवंत असून ६६ हजार २१७ रोपटे मृत पावल्याचे लक्षात आले. गोंदिया जिल्ह्याच्या ३ हजार ४१५ ठिकाणी शासनाच्या विविध विभाग व सामाजिक संघटनांच्या माध्यामातून रोपटे लावण्यात आले होते. ती रोपटे जीवंत ठेवण्यात गोंदिया जिल्हा यशस्वी राहीला आहे. वृक्ष संवर्धनात गोंदियाने मजल मारली आहे.जलसंधारण व जलसंपदाची १०० टक्के रोपटी जिवंतया उपक्रमाल लावलेली रोपटे जलसंधारण व जलसंपदा विभागाने लावलेली रोपटे १०० टक्के जीवंत आहेत. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने लावलेले ६० टक्के, न्यायालयाने लावलेले ५९ टक्के रोपटे जीवंत राहीले. तर इतर सर्व विभागांची रोपटे ८० टक्यापेक्षा अधिक जीवंत आहेत.जनजागृतीचे फलीतजिल्ह्यात हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ९ चित्ररथ काढण्यात आले. ९१ पथनाट्य, कलापथकाच्या माध्यामतून जनजागृती करून ३१८ सभा घेऊन प्रचार-प्रसार करण्यात आला होता. या जनजागृतीमुळे हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र उपक्रमात गोंदियाने रोपटे जिवंत ठेवण्यात चांगले यश मिळवले आहे.