शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

हरित महाराष्ट्रात गोंदिया समृद्ध

By admin | Updated: April 10, 2017 01:08 IST

हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने देत राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला.

नरेश रहिले  गोंदियाहरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने देत राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ४७ हजार ३४३ रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यामुळे वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली होती. १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी लावलेल्या ९ लाख ६३ हजार ६०० रोपट्यांपैकी ८ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जीवंत असल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. ९३ टक्के रोपटे जीवंत असून हरित महाराष्ट्रात गोंदिया समृध्द होत आहे.गोंदिया वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि इतर यंत्रणा मिळून हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. वृक्ष लागवड करून मोकळे होणे हा नित्यक्रम राहू नये शासनाने सांगितल्यामुळे लावलेल्या रोपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी संबजित यंत्रणानी घेतली. परिणामी गोंदिया जिल्ह्यात लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी ९३ टक्के रोपटे जगले आहेत. हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र हा राज्य सरकारचा नारा गोंदियाने यशस्वी केला. वनमहोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ९ हजार ४७ हजार ३४३ वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्टे होती. परंतु उद्दीष्टांपेक्षा अधिक ९ लाख ६२ हजार ६०० रोपटे लावण्यात आले. ही लावलेली रोपटे जीवंत आहेत की मृत्यू पावली यासाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित करून माहिती मागविण्यात आली. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याने १ जानेवारी २०१७ रोजी पाहणी केल्यामुळे लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी ८ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जीवंत असून ६६ हजार २१७ रोपटे मृत पावल्याचे लक्षात आले. गोंदिया जिल्ह्याच्या ३ हजार ४१५ ठिकाणी शासनाच्या विविध विभाग व सामाजिक संघटनांच्या माध्यामातून रोपटे लावण्यात आले होते. ती रोपटे जीवंत ठेवण्यात गोंदिया जिल्हा यशस्वी राहीला आहे. वृक्ष संवर्धनात गोंदियाने मजल मारली आहे.जलसंधारण व जलसंपदाची १०० टक्के रोपटी जिवंतया उपक्रमाल लावलेली रोपटे जलसंधारण व जलसंपदा विभागाने लावलेली रोपटे १०० टक्के जीवंत आहेत. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने लावलेले ६० टक्के, न्यायालयाने लावलेले ५९ टक्के रोपटे जीवंत राहीले. तर इतर सर्व विभागांची रोपटे ८० टक्यापेक्षा अधिक जीवंत आहेत.जनजागृतीचे फलीतजिल्ह्यात हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ९ चित्ररथ काढण्यात आले. ९१ पथनाट्य, कलापथकाच्या माध्यामतून जनजागृती करून ३१८ सभा घेऊन प्रचार-प्रसार करण्यात आला होता. या जनजागृतीमुळे हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र उपक्रमात गोंदियाने रोपटे जिवंत ठेवण्यात चांगले यश मिळवले आहे.