शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

गोंदिया तालुक्यात ग्रामपंचायतींचे निधी मिळूनही कामाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 29, 2016 01:50 IST

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयामार्फत केंद्र सरकारकडून बराच निधी मिळाला.

अधिकाऱ्यांचा दबाव : प्रशासकीय मान्यतेसाठी अडवणूकगोंदिया : ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयामार्फत केंद्र सरकारकडून बराच निधी मिळाला. मात्र तो उपयोगी लावण्याकडे गोंदिया तालुक्यात दुर्लक्ष होत आहे. प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय कोणतीही कामे करू नका, असा दबाव बीडीओंकडून आणला जात असल्यामुळे अनेक कामांना खीळ बसली आहे.१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्र शासनाने राज्याला १६२३.३२ कोटी इतका निधी दिला. त्यापैकी गोंदिया जिल्ह्याला २८ कोटी ८३ लाख ७० हजार रुपये मिळाले. त्या निधीपैकी गोंदिया तालुक्याला ७ कोटी १६ लाख ७९ हजार ७२३ रुपये मिळाले. ही रक्कम मार्च २०१६ पर्यंत गावातील पायाभूत सुविधांवर खर्च करावी अशी शासनाची अट होती. ती खर्च न झाल्यामुळे ग्रामविकास विभागातील मुख्य सचिव व्ही.गिरीराज यांनी २९ एप्रिल २०१६ ला तत्काळ पत्र काढून ३० जून २०१६ पर्यंत त्या निधीच्या खर्चास मुदतवाढ दिली. परंतू गोंदिया तालुक्यातील १०९ ग्राम पंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायतींनी मिळालेल्या विकास निधीला हातसुध्दा लावला नाही. शासनाचे परिपत्रक असूनसुद्धा निधी का खर्च झाला नाही? याला जवाबदार कोण? शासन ही प्रशासन? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहेत.बीडीओची प्रशासकीय मंजुरी घेऊनच कामे करावी, अशी शासन परिपत्रकात कुठेही अट नाही. इतर तालुक्यात बीडीओची प्रशासकीय मान्यता घेऊन कामे होत नाही. मग गोंदिया पंचायत समितीला कामे करण्याकरीता बीडीओची अट कशी? बीडीओ एस.के.वालकर व विस्तार अधिकारी रविंद्र पराते यांनी प्रशासकीय मान्यतेशिवाय कामे करू नका, असा तोंडी आदेश दिल्याचे सांगितले जाते. ज्या ग्राम पंचायतींनी मान्यतेशिवाय कामे केलाी त्यांची अडवणूक केली जात आहे.विस्तार अधिकारी पराते आपल्या अधिकारपणाचा तोरा दाखवून विकास कामांची गती रोखत असल्याचे काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा त्यामुळे त्यांना वरिष्ठांनी योग्य समज द्यावी, अन्यथा ग्रामपंचायतीच्या विकास कामांची गती थांबल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा सरपंच, सचिवांसह गावकऱ्यांनी व्यक्त केली.(जिल्हा प्रतिनिधी)