शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया मेडिकल कॉलेजला मिळणार १०० जागा

By admin | Updated: June 15, 2016 02:20 IST

प्रस्तावित गोंदिया मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने १०० जागा मंजूर केल्या आहेत. उच्च न्यायालयानेही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अनुकूल मतप्रदर्शन केले आहे.

नाना पटोले : एमसीआयच्या परवानगीनंतरच सुरू होणारगोंदिया : प्रस्तावित गोंदिया मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने १०० जागा मंजूर केल्या आहेत. उच्च न्यायालयानेही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अनुकूल मतप्रदर्शन केले आहे. त्यासंदर्भात येत्या १६ जूनला अंतिम सुनावणीही आहे. मात्र हे कॉलेज एमसीआयच्या परवानगीशिवाय सुरू होणार नाही, असे सांगून कोणी राजकीय लोकांनी एकट्याने हे क्रेडिट घेऊ नये, असा टोला खासदार नाना पटोले यांनी लावला.गोंदियात मंगळवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत खा.पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, काही लोक होर्र्डिंग्ज लावून मेडिकल कॉलेजचे क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. कॉलेजला एमसीआयची मंजुरी मिळण्यासाठी लागणाऱ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मी खासदार झाल्यानंतर जमीन खरेदी करण्यापासून पुढील प्रक्रिया सुरू झाली. मधल्या काळात कॉलेजसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी तयार करण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत. हे कोणाचे एकाचे क्रेडिट नसून सर्वांचेच क्रेडिट असल्याचे ते म्हणाले.गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्याकडे खा.पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही परीस्थिती केवळ गोंदियाच नाही तर संपूर्ण देशभर आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांचे सभागृहात लक्ष वेधले होते. मात्र आरोग्यमंत्र्यांनी त्या मुद्द्याला बगल दिली. ही परिस्थिती बदलण्यासाठी सिस्टीममध्येच बदल करावा लागेल, असे खा.पटोले म्हणाले. गोंदिया शहरातील वाढत्या वीज समस्येवर उपाय म्हणून राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ महिन्यांपूर्वीच शहरासाठी अंडरग्राऊंड केबल सिस्टम मंजूर केली होती. मात्र त्याचे काय झाले, याबाबत विचारले असता पटोले यांनी अधीक्षक अभियंत्यांना फोन करून माहिती घेतली. या कामाचा प्रस्ताव आता वीज कंपनीकडून सरकारला दिला जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. प्रस्तावित मेडिकल कॉलेजमधील फर्निचर घोटाळा, शहरातील बहुतांश मोठी कामे सुपर कन्स्ट्रक्शन या एकाच कंपनीला देण्याचा प्रकार अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकारांना खासदारांना छेडले. मात्र त्याबाबत पुरेशी माहिती नसून माहिती घेतो असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हा परिषदेतील युतीचा निर्णय २४ लागेल्या काही महिन्यातील घडामोडी आणि त्यातून ताणले गेलेले भाजप व काँग्रेसमधील संबंध पाहता जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेस-भाजपा युती कायम ठेवायची किंवा नाही याबाबत पक्षात विचारविनिमय झाला आहे. काही वरिष्ठ लोक या मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांनाही भेटले. त्यांनी तुमच्या स्तरावर निर्णय घ्या, असे सांगितल्याचे खा.पटोले म्हणाले. त्यामुळे येत्या २४ जूनला अर्जुनी मोरगावमध्ये पक्षाची जिल्हास्तरिय बैठक होणार असून त्यात जिल्हा परिषदेतील भाजप-काँग्रेस युतीसंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या युतीबद्दल आपले वैयक्तिक मत विचारले असता ही युती अयोग्यच आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.धानाच्या भाववाढीवर समाधानी नाहीकेंद्र सरकारने पुन्हा धानाला ६० रुपये भाववाढ दिली यावर बोलताना खा.पटोले म्हणाले ही भाववाढ समाधानकारक निश्चितच नाही. परंतू शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला देण्यासाठी कृषी पीक विमा योजनेत बराच बदल केला आहे. आता ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. शिवाय विम्याची फक्त २ टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायची असून ९८ टक्के रक्कम सरकार भरणार असल्याचे ते म्हणाले.