शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

कर्जमाफी देऊन दिलासा द्या

By admin | Updated: June 26, 2016 01:34 IST

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सरकार व नाबार्डची मंजुरी येण्यास उशिर झाला तरी बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले.

राजेंद्र जैन : जिल्हा बँकेने स्वनिधीतून वाटले ६५ कोटीगोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सरकार व नाबार्डची मंजुरी येण्यास उशिर झाला तरी बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले. दोन वर्षापासून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जवसुली करणे अवघड होत असून त्यांच्याकडील कर्ज सरकारने माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ.राजेंद्र जैन यांनी केली आहे.यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ.जैन यांनी सांगितले की, जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटपात नेहमीच आघाडीवर राहते. जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून कर्जासाठी जी लिमिट मिळते त्यासाठी गेल्या एक महिन्यापासून जिल्हा बँक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहकार विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही आतापर्यंत जिल्हा बँकेची लिमिट मंजूर झाली नाही. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा असे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण केल्या जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेने १८ जूनच्या संचालक मंडळाच्या सभेत ९.७५ टक्के व्याज दराने राज्य सहकारी बँकेकडून लिमिट प्रस्ताव मंजूर करवून घेऊन आता कर्ज वाटप नव्या जोमाने सुरू केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला. वसुली न झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण त्यातही शेतकऱ्यांचे हित जोपासत असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)