शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महात्मा फुले वॉर्डातील रहिवाशांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

तिरोडा : शहरातील महात्मा फुले वॉर्डात मागील ५० वर्षांपासून नागरिकांचा अधिवास आहे. मात्र हा परिसर झुडपी जंगलात मोडतो. त्यामुळे ...

तिरोडा : शहरातील महात्मा फुले वॉर्डात मागील ५० वर्षांपासून नागरिकांचा अधिवास आहे. मात्र हा परिसर झुडपी जंगलात मोडतो. त्यामुळे येथील नागरिकांना पट्टे मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.१०) महात्मा फुले वॉर्डातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे यांना दिले.

शहरातील महात्मा फुले वॉर्ड झुडपी जंगल परिसरात मोडतो. येथे नागरिकांचे वास्तव्य मागील ५० वर्षांपासून आजतागायत आहे. नागरिक झोपड्या तयार करून तर काहींनी मातीची घरे तयार केली आहेत. ती घरे आता अतिशय जीर्ण झाली आहेत. येथील बहुसंख्य नागरिक हे बीपीएल गटातील आहेत. बीपीएलधारकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजनांचा नगर परिषदेने लाभ सुद्धा दिला आहे. सिमेंटचे रस्ते, नाल्या, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची सोय, समाजमंदिर, समाजभवन तथा शौचालय निर्माण केले आहेत. परंतु हे क्षेत्र झुडपी जंगल परिसरात मोडत असल्याचे सांगून आवास योजनेचा लाभ देताना शासन-प्रशासन येथील नागरिकांना वंचित ठेवत आहे. सध्या केंद्र आणि राज्यस्तरावरून घरकुलाची योजना कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ घेण्यास आणि नगर परिषदेला देण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांनी पट्टे मिळावे यासाठी मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.त्यांनी तीन महिन्यांत समस्या मार्गी लागेल असे बोलून त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतर सतत उपविभागीय अधिकाऱ्यांची होणारी बदली व जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा याच दरम्यान बदली झाल्यामुळे हे प्रकरण "जैसे थे” च्या स्थितीत राहिले. फुले वॉर्डातील रहिवासी आजही पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्टमंडळात स्वप्नील शहारे, बाबुलाल किरणापुरे, रवी कडव, शिगेश ढबाले, मोरेशवर सोनेवाने, जगदीश कोसरे व इतर नागरिक उपस्थित होते. आपण स्वतः या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे उपविभागीय अधिकारी नाष्टे यांनी सांगितले.