शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हेही तंटामुक्त गाव समितीकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 02:01 IST

महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविणाऱ्या समित्यांना गंभीर गुन्हे किंवा अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे सोडविण्याचा ...

शासनाने मागविले होते मत : लेखक व पत्रकारांनी शासनाला दिली होती माहितीगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविणाऱ्या समित्यांना गंभीर गुन्हे किंवा अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे सोडविण्याचा अधिकार शासनाने मोहीम राबविणाऱ्या समित्यांना दिला नाही. परंतु या गुन्ह्यांची वास्तविक पार्श्वभूमी गावकऱ्यांनाच माहीत असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे सोडविण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.मागील चार वर्षापूर्वी तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे तंटामुक्त गाव समितीला सोडविण्याचा अधिकार द्यावा का, याबाबत विचारमंथन करण्यासाठी साहित्यिक व पत्रकारांचे मत मागविले होते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या समित्या वर्षाकाठी एका जिल्ह्यात हजारो तंटे सामोपचाराने सोडवितात. दिवाणी, महसूली व इतर तंट्यांसोबत अनेक फौजदारी गुन्हे समित्या यशस्वीरीत्या हाताळतात. परंतु खून, बलात्कार, दरोडे व अ‍ॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे हाताळण्यास तंटामुक्त गाव समितीला शासनाने मनाई केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले अनेक गुन्हे बोगस असल्याचे लक्षात येते. गावात घडणाऱ्या घटनांची वास्तविक माहिती गावकऱ्यांना असल्याने गावकरीच या गुन्ह्यांची हाताळणी यशस्वीरीत्या करू शकतात. याचेच उदारहरण म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवळी येथील जातीय समीकरण अ‍ॅट्रॉसिटीकडे वळण घेत होते. परंतु तेथील तंटामुक्त गाव समितीने हे प्रकरण यशस्वीरीत्या हाताळून गावाला शांततेतून समृद्धीकडे नेले व गुन्हा दाखल होण्याची पाळी येऊ दिली नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खैरलांजी व वडेगाव यासारख्या घटना घडतात. त्यामधून महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघते. त्याचप्रमाणे अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणाने मोठे वाद उद्भवण्याची शक्यता असते. अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रिव्हेंशन आॅफ अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट या कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तक्रारींमुळे गावाची शांतता धोक्यात येते. वास्तविकता वेगळीच असून कोणत्याही प्रकरणाला अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असतो. ज्या गावात अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होते. त्या गावातील समित्यांनी पुढाकार घेऊन गावात उद्भवलेला वाद सामंजस्याने सोडवून गावाची शांतता अबाधित ठेवली. गावातील परिस्थिती तंटामुक्त गाव मोहिमेला माहीत असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचे प्रकरण हाताळण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम रामबाण उपाय असल्याचे अनेक समित्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शासनाने २ फेब्रुवारी २०१२ रोजी गृहमंत्रालयाने एक पत्र काढून लेखक व पत्रकारांना मते मागितली आहेत. हे पत्र १० फेब्रुवारी रोजी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. त्या पत्राच्या आधारावर राज्यातील तंटामुक्त मोहीमेवर लिखाण करणाऱ्या बातमीदारांना व लेखकांना माहिती मागविली होती. परंतु त्यानंतर या मुद्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या प्रकरणाची सत्यता पुढे यावी यासाठी त्या गावातील व शेजाऱ्यांना परिस्थितीची जाणीव असते. यासाठी जातिवाचक शिविगाळ झाली का याची माहिती गावकऱ्यांना असल्यामुळे ते या प्रकरणात सत्यता असल्याचे म्हणाले तर गुन्हा दाखल करण्यात यावा असा सूरही महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्यांकडून येत आहे.(तालुका प्रतिनिधी)