शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार रुपये तात्काळ द्या

By admin | Updated: June 28, 2017 01:15 IST

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत असून चिंतातूर आहे.

शेतकऱ्यांना केवळ दिलासा : विलंबामुळे रोवणीची वेळही निघणार लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत असून चिंतातूर आहे. त्याच्यासमोर सर्वात मोठी समस्या शेतीसाठी लागणाऱ्या आर्थिक समस्येची आहे. शासनाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर होती. मात्र आजपर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना होकार दिला नसल्याने नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी जि.प. सदस्य मनोज डोंगरे व माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या दारी सतत शेतकऱ्यांचा डेरा दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांना कधी यश मिळेल, हे स्पष्ट सांगता येत नाही. शेतकऱ्यांना सरसकट १० हजार रूपये कोणतीही अट न घालता सातबारा पाहून पीक कर्ज देण्यात यावे. वेळ निघाल्यानंतर पैसे दिल्याने शेतकऱ्यांना बियाणे घेता येणार नाही, असे मत जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी व्यक्त केले. माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या घरी शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांसह अनेक गावांचे सरपंच व उपसरपंच प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून भविष्यात शेतकऱ्यांचे संकट वाढणार असून वर्तमान शासन कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे माजी आ. बन्सोड यांनी उपस्थितांना पटवून दिले. पाऊस खोळंबल्याने धान पेरणीला एक महिना विलंब झालेला आहे. या समस्येमुळे शेतकरी चिंतातूर आहेत. ज्यांनी कर्जाची रक्कम परतफेड केली नाही, त्यांना शासनाच्या घोषणेनुसार मदत मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत. मात्र अद्याप एकाही शेतकऱ्यास १० हजार रूपये मिळण्याची बाब माहीत झाली नाही, असे माजी आ. बन्सोड म्हणाले. घोषणेनुसार शासनाने तात्काळ शेतकऱ्यांसाठी मदतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देत वेळ काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मिळेल तेव्हाचा मिळाला असे समजून शेतीच्या कामाकडे लक्ष घालावे, असा सल्लाही त्यांनी दिला. वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना कर्जमुक्तीची गरज राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी शेती करतात. कोणतीही सरकार कोणत्याही कर्मचाऱ्यास अधिकचे वेतन देत नाही. शेतीच्या उत्पादनात सहकार्य करावे, यासाठी कर्ज काढून शेती करतात. शेतीसाठी अशा हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतीतून त्यांना निराशाच हाती लागली. हे कर्मचारी शेतीकर्ज व पगार तारण कर्जात गुंतलेले आहेत. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांंना मोठा पगार नसून त्यांना कर्जमुक्तीतून वगळणे, हे शासनाचे चुकीचे निर्णय आहे. त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, असे माजी आ. दिलीप बन्सोड म्हणाले.