शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

वृक्ष लागवडीसाठी सज्ज राहा

By admin | Updated: June 16, 2016 02:21 IST

आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

राजकुमार बडोले : पर्यावरण संतुलनासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी पुढाकार घ्यावागोंदिया : आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येत्या १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्र मात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १३ जून रोजी आयोजित सभेत जिल्ह्यात १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती छाया दसरे, सडक-अर्जुनी पंचायत समितीचे सभापती कविता रंगारी, अर्जुनी-मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स. सभापती दिलीप चौधरी, सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म हा अत्यंत महत्वाचा कार्यक्र म आहे. जुन्या योजनेतून केलेली वृक्ष लागवड व १ जुलैला करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीतील रोपे जगविणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारी रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्र म हा नियोजनबध्द पध्दती राबवावा, असेही त्यांनी सांगितले.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १ जुलैला होणारा २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म जिल्ह्यात लोकचळवळ म्हणून राबविण्यात येणार आहे. एक घर एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बचत गटांच्या महिला व विद्यार्थ्यांना या वृक्ष लागवडीत सहभागी करण्यात येणार आहे. हा कार्यक्र म प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध यंत्रणांच्या आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी आकाशवाणी, स्थानिक केबल नेटवर्कवरून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी रोपे लावण्यात येणार आहेत त्या ठिकाणी रोपांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९ लाख ७२ हजार ३४३ रोपे जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत लावण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व यंत्रणांना या कार्यक्र मात प्रभावीपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पंचायत समित्यांचा परिसर, अंगणवाडी पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत यासह अन्य कार्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करणार येणार असून रोपे जगविण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.उपसंचालक बडगे माहिती देताना म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्र म सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण २४ लाख ८० हजार, वनविभाग १७ लाख ०९ हजार २३०, वनविकास महामंडळ ङ्क्त४ लाख ४० हजार, कृषी विभाग ३१ हजार ७५५ व खासगी १ लाख ६९ हजार ७८५ या विभागांनी एकूण २५ लाख ९८ हजार ७७० विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली आहे.सदर कार्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)