शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी सज्ज राहा

By admin | Updated: June 16, 2016 02:21 IST

आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

राजकुमार बडोले : पर्यावरण संतुलनासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी पुढाकार घ्यावागोंदिया : आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येत्या १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्र मात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १३ जून रोजी आयोजित सभेत जिल्ह्यात १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती छाया दसरे, सडक-अर्जुनी पंचायत समितीचे सभापती कविता रंगारी, अर्जुनी-मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स. सभापती दिलीप चौधरी, सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म हा अत्यंत महत्वाचा कार्यक्र म आहे. जुन्या योजनेतून केलेली वृक्ष लागवड व १ जुलैला करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीतील रोपे जगविणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारी रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्र म हा नियोजनबध्द पध्दती राबवावा, असेही त्यांनी सांगितले.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १ जुलैला होणारा २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म जिल्ह्यात लोकचळवळ म्हणून राबविण्यात येणार आहे. एक घर एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बचत गटांच्या महिला व विद्यार्थ्यांना या वृक्ष लागवडीत सहभागी करण्यात येणार आहे. हा कार्यक्र म प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध यंत्रणांच्या आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी आकाशवाणी, स्थानिक केबल नेटवर्कवरून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी रोपे लावण्यात येणार आहेत त्या ठिकाणी रोपांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९ लाख ७२ हजार ३४३ रोपे जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत लावण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व यंत्रणांना या कार्यक्र मात प्रभावीपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पंचायत समित्यांचा परिसर, अंगणवाडी पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत यासह अन्य कार्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करणार येणार असून रोपे जगविण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.उपसंचालक बडगे माहिती देताना म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्र म सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण २४ लाख ८० हजार, वनविभाग १७ लाख ०९ हजार २३०, वनविकास महामंडळ ङ्क्त४ लाख ४० हजार, कृषी विभाग ३१ हजार ७५५ व खासगी १ लाख ६९ हजार ७८५ या विभागांनी एकूण २५ लाख ९८ हजार ७७० विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली आहे.सदर कार्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)