शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वृक्ष लागवडीसाठी सज्ज राहा

By admin | Updated: June 16, 2016 02:21 IST

आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

राजकुमार बडोले : पर्यावरण संतुलनासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी पुढाकार घ्यावागोंदिया : आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येत्या १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्र मात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १३ जून रोजी आयोजित सभेत जिल्ह्यात १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती छाया दसरे, सडक-अर्जुनी पंचायत समितीचे सभापती कविता रंगारी, अर्जुनी-मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स. सभापती दिलीप चौधरी, सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म हा अत्यंत महत्वाचा कार्यक्र म आहे. जुन्या योजनेतून केलेली वृक्ष लागवड व १ जुलैला करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीतील रोपे जगविणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारी रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्र म हा नियोजनबध्द पध्दती राबवावा, असेही त्यांनी सांगितले.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १ जुलैला होणारा २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म जिल्ह्यात लोकचळवळ म्हणून राबविण्यात येणार आहे. एक घर एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बचत गटांच्या महिला व विद्यार्थ्यांना या वृक्ष लागवडीत सहभागी करण्यात येणार आहे. हा कार्यक्र म प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध यंत्रणांच्या आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी आकाशवाणी, स्थानिक केबल नेटवर्कवरून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी रोपे लावण्यात येणार आहेत त्या ठिकाणी रोपांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९ लाख ७२ हजार ३४३ रोपे जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत लावण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व यंत्रणांना या कार्यक्र मात प्रभावीपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पंचायत समित्यांचा परिसर, अंगणवाडी पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत यासह अन्य कार्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करणार येणार असून रोपे जगविण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.उपसंचालक बडगे माहिती देताना म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्र म सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण २४ लाख ८० हजार, वनविभाग १७ लाख ०९ हजार २३०, वनविकास महामंडळ ङ्क्त४ लाख ४० हजार, कृषी विभाग ३१ हजार ७५५ व खासगी १ लाख ६९ हजार ७८५ या विभागांनी एकूण २५ लाख ९८ हजार ७७० विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली आहे.सदर कार्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)