शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 01:51 IST

पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे,

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सभागोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील ८७ गावे पुराने बाधित होतात. तसेच गोंदिया शहरातील नाल्याचे पाणी अतिवृष्टीमुळे लोकांच्या वस्त्यांमध्ये शिरते. त्यामुळे तेथील कुटुंबांना या काळात सुरिक्षत स्थळी हलवावे. नाल्यांची साफसफाई व नाल्यातील गाळ काढण्याचे काम आठ दिवसांच्या आत करावे. नाल्यांमध्ये कचरा, पॉलीथिन साचून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी गटारे, नाले वाहती करावी.८७ पूरबाधित गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देवून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या गावातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पूरपरिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नदी व नाल्यांच्या सरळीकरणाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावी. त्यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरास अडथळा निर्माण होणार नाही. लोकवस्तीत पुराचे पाणी शिरणार नाही. अशा लोकवस्तीतील नागरिकांना बाधित अथवा स्थलांतरीत होण्याची वेळ येणार नाही. पूरबाधित गावात बाधित होण्याची कारणे शोधून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जी कामे करावी लागणार आहेत, त्या कामांचे १० दिवसात अंदाजपत्रक तयार करावेत. त्या कामासाठी आवश्यक निधीची मागणी राज्य आपत्ती प्राधिकरणाकडे लवकर करता येईल. बोटी, होड्या या काळात सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्यात. यंत्रणांनी योग्य समन्वयातून आपत्तीवर मात करावी, असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या स्थळांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. जी गावे पुराने बाधित होतात त्या गावातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असावेत. तसेच पुरेसा औषधांचा साठा असणेही महत्वाचे आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर पिण्याच्या पाण्याचे स्रेत असलेल्या ठिकाणी टाकावे. पाणी पुरवठा योजना पुराच्या पाण्यात सापडल्यास पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जोखीम न घेता या योजना रिमोट कंट्रोलने सुरू करण्यासाठी लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी सांगितले की, सालेकसा व आमगाव तालुक्यातील काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो. रात्रीच्या वेळी असा प्रसंग उद्भवल्यास एखाद्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेणे शक्य होत नाही. प्रसंगी जीव जाण्याची वेळसुध्दा येऊ शकते. अशाप्रकारची परिस्थिती उदभवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व बाघ इटियाडोह विभागाने वेळीच लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.सभेला समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, बाघ व इटियाडोहचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पठाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी के.डी. मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा रक्त संक्र मण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांची उपस्थिती होती. या वेळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता समीर बनसोडे यांनी सादरीकरण करून जिल्ह्यातील पूरबाधित गावांची माहिती तसेच रेड व ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या गावांची माहिती दिली. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)