शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 01:51 IST

पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे,

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सभागोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील ८७ गावे पुराने बाधित होतात. तसेच गोंदिया शहरातील नाल्याचे पाणी अतिवृष्टीमुळे लोकांच्या वस्त्यांमध्ये शिरते. त्यामुळे तेथील कुटुंबांना या काळात सुरिक्षत स्थळी हलवावे. नाल्यांची साफसफाई व नाल्यातील गाळ काढण्याचे काम आठ दिवसांच्या आत करावे. नाल्यांमध्ये कचरा, पॉलीथिन साचून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी गटारे, नाले वाहती करावी.८७ पूरबाधित गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देवून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या गावातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पूरपरिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नदी व नाल्यांच्या सरळीकरणाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावी. त्यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरास अडथळा निर्माण होणार नाही. लोकवस्तीत पुराचे पाणी शिरणार नाही. अशा लोकवस्तीतील नागरिकांना बाधित अथवा स्थलांतरीत होण्याची वेळ येणार नाही. पूरबाधित गावात बाधित होण्याची कारणे शोधून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जी कामे करावी लागणार आहेत, त्या कामांचे १० दिवसात अंदाजपत्रक तयार करावेत. त्या कामासाठी आवश्यक निधीची मागणी राज्य आपत्ती प्राधिकरणाकडे लवकर करता येईल. बोटी, होड्या या काळात सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्यात. यंत्रणांनी योग्य समन्वयातून आपत्तीवर मात करावी, असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या स्थळांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. जी गावे पुराने बाधित होतात त्या गावातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असावेत. तसेच पुरेसा औषधांचा साठा असणेही महत्वाचे आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर पिण्याच्या पाण्याचे स्रेत असलेल्या ठिकाणी टाकावे. पाणी पुरवठा योजना पुराच्या पाण्यात सापडल्यास पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जोखीम न घेता या योजना रिमोट कंट्रोलने सुरू करण्यासाठी लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी सांगितले की, सालेकसा व आमगाव तालुक्यातील काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो. रात्रीच्या वेळी असा प्रसंग उद्भवल्यास एखाद्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेणे शक्य होत नाही. प्रसंगी जीव जाण्याची वेळसुध्दा येऊ शकते. अशाप्रकारची परिस्थिती उदभवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व बाघ इटियाडोह विभागाने वेळीच लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.सभेला समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, बाघ व इटियाडोहचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पठाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी के.डी. मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा रक्त संक्र मण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांची उपस्थिती होती. या वेळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता समीर बनसोडे यांनी सादरीकरण करून जिल्ह्यातील पूरबाधित गावांची माहिती तसेच रेड व ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या गावांची माहिती दिली. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)