शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तंत्रनिकेतनच्या पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

अर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत सरस गुण देण्यात ...

अर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत सरस गुण देण्यात आले. त्यामुळे उन्हाळी २०२० पर्यंत उत्तीर्ण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांना त्यातुलनेत टक्केवारी कमी असल्याने हजारों जुने विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित झाले आहेत. प्रवेश न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद पडल्या. या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत गुणांची सरबराई झाली. जवळपास प्रत्येक विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविका अंतिम वर्षात उत्तीर्ण झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. याचा जुन्या विद्यार्थ्यांवर थेट परिणाम झाला. हा एकप्रकारचा जुन्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो व यासाठी मर्यादित जागा असतात. या जागांवर कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत गुणांची खैरात झाल्याने अंतिम वर्षाला राहून तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्णी लागली.

प्राविण्यप्राप्त व प्रथम श्रेणीत पदविका मिळविणारे जुने विद्यार्थी मात्र प्रवेशापासून वंचित राहिले. एरव्ही दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त असायच्या. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या शैक्षणिक सत्रामुळे स्पर्धा वाढली व अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झाले. आजघडीला पूर्व विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ( बीई ) थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी एकही जागा शिल्लक नाही. आता प्रवेश न मिळालेल्या अशा विद्यार्थ्यांनी वर्षभर काय करायचे असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.

---------------------

दलालांचा सुळसुळाट

शहरी भागात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत तंत्रनिकेतन संस्था कमी आहेत. संस्थांची गुत्तेदारी कायम टिकवून ठेवण्यासाठी संस्थाचालकांनी ग्रामीण भागात दलाल नेमले आहेत. हे दलाल तंत्रनिकेतन उत्तीर्ण व अंतिम वर्षाला असलेल्या पालकांच्या घरी भेटी देऊन अभियांत्रिकी प्रवेश मिळवून देतो, त्याउपरही त्याला पैसे देऊ, अभियांत्रिकी अभ्यासक्रमादरम्यान त्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशी बतावणी करतात. पालकांना मोफत अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रलोभन दाखवितात. या मोबदल्यात संस्थाचालक दलालांकडून विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र मिळताच त्यांना प्रति विद्यार्थी १५ ते २० हजार रुपयांची बक्षिसी देतात. मात्र यावर्षी दलालांचा डाव फसला. संस्थाचालकांनी दिलेली बक्षिसी यावर्षी पहिल्यांदाच दलालांनी त्यांना परत केली. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालक डल्ला मारतात. यातून ते दरवर्षी लाखोंची माया मिळवितात. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचा पैशांसाठी छळ होतो. अनेक विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र अडवून ठेवले जात असल्याचेही वृत्त आहे. नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली, सेंदूरवाफा, तुमसर, तिरोडा, पवनी व ग्रामीण परिसरात अशा दलालांचे रॅकेटच असल्याचे समजते.