शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फुलचूर, फुलचूरटोला नगरपंचायतीसाठी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

गोंदिया : शहरालगतच्या फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, यासंबंधीचा प्रस्ताव ...

गोंदिया : शहरालगतच्या फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, यासंबंधीचा प्रस्ताव २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही ग्रामपंचायतींकडून सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, यासंदर्भात मार्गदर्शन व सूचनांच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी सतत टाळाटाळ केली जात आहे. या दोन ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत करावे, या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश चतूर व नागरिक बुधवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

नगर विकास मंत्रालयाने फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायती नगर पंचायतीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केल्यानंतरही दोन वर्षांपासून तो प्रस्ताव धूळखात पडला आहे. यामुळे फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत तर अन्नत्याग सत्याग्रह करू, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून देण्यात आला होता. शहरालगतच्या फुलचूर व फुलचूरटोला या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. तसेच जिल्हा मुख्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ही महत्त्वाची कार्यालये या गाव क्षेत्रात मोडतात. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींच्यावतीने २०१९मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. त्या प्रस्तावांची छाननी करून २६ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणना, अकृषक व सर्वेक्षण पूर्ण केले व तो प्रस्ताव शासनाला सादर करणार एवढ्यात मार्च २०२०पासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले.

परिणामी हा प्रस्ताव शासन दरबारी पोहोचू शकला नाही. दरम्यान, शासनाने २६ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविल्याबाबत सूचित केले होते. मात्र, त्यानंतरही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. याबाबत ग्रामवासीयांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन १६ जुलै २०२१ रोजी पुन्हा निवेदन सादर केले. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारुप पत्र तयार करण्याला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने त्वरित फुलचूर व फुलचूरटोलाला नगर पंचायतीचा दर्जा द्यावा व जिल्हा प्रशासनाने तो अहवाल शासनाला त्वरित पाठवावा, या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला माजी आमदार केशव मानकर, हेमंत पटले, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे, संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे यांनी भेट दिली.