शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘मटका कोला’ची नि:शुल्क सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:26 IST

उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने वाढत्या उन्हासोबत पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे.

गोंदिया रेल्वे स्थानक : तहानलेल्या प्रवाशांच्या व्याकुळ कंठांना गारवागोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने वाढत्या उन्हासोबत पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. विहिरी व बोअरवेल्समधील पाणी खोलात जात आहे. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकावर ‘मटका कोला’ची नि:शुल्क जलसेवा आता प्रवाशांची तहान भागविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर तहानलेल्या प्रवाशांच्या व्याकुळकंठांना शीतलता मिळत आहे.श्री रणछोडदास महाराज यांच्या प्रेरणेने सन १९७० मध्ये नगर नागरिक सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे प्रमुख कुमारभाई माचिसवाले आहेत. त्यांच्या सहकार्याने दरवर्षी गोंदिया रेल्वे स्थानकावर मटका कोला या नि:शुल्क जलसेवेद्वारे प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ही समिती सन १९७० पासून अविरतपणे रेल्वे स्थानकावर पाणी वितरणाची सेवा नि:शुल्कपणे देत आहे.दरवर्षी गोंदिया रेल्वे स्थानकावर तीन ठिकाणी ही नि:शुल्क जलसेवा कार्यरत असून प्रवाशांची तहान भागवित आहे.गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म-३ व ४ वरच्या एका टोकावर थंड पाण्याने भरलेले ३० ते ४० मोठमोठे घडे (नान) ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या टोलावरही थंड पाण्याने भरलेले मटके ठेवण्यात आले आहेत. तिसऱ्या ठिकाणीसुद्धा लवकरच मटका कोला सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी १५ नानची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर नागरिक सेवा समितीच्या वतीने नि:शुल्क पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.रायपूर ते नागपूर या रेल्वे प्रवासादरम्यान गोंदिया हेच एकमेव असे रेल्वे स्थानक आहे, जेथे प्रवाशांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसांत नि:शुल्कपणे उपलब्ध करून दिले जाते. या मटका कोलाचे पाणी वितरण करण्यासाठी गोंदिया शहर व लगतच्या ग्रामीण परिसरातील हिवरा, कटंगीकला व इतर गावातील मुले-मुली, महिला व पुरूष येतात. त्यांना नगर नागरिक सेवा समितीकडून आठवडी किंवा मासिक वेतनही दिले जाते.काही जण तहानलेल्यांना पाणी पाजणे म्हणजे पुण्यकार्य आहे, अशी धारणा ठेवून नि:शुल्क पाणी वाटपाचे काम करीत आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावर नि:शुल्क जलसेवेच्या ठिकाणी आळीपाळीने सात जणांना पाणी वितरणासाठी ठेवण्यात आले आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. या नि:शुल्क जलसेवेमुळे गोंदिया रेल्वे स्थानक प्रवाशांना सुपरिचित झाले आहे.रेल्वेगाडीत बसणारे प्रवासी ज्यांना गोंदियात उतरायचे नसते, ते सुद्धा गोंदिया स्थानकावर उतरून आपली तहान भागवितात. तसेच पुढील प्रवासासाठी आपल्या जवळच्या बाटल्या येथील थंडगार पाण्याने भरून नेतात.तेच पाणी त्यांच्या पुढील प्रवासात पिण्यासाठी उपयोगी ठरते.विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर नागरिक सेवा समिती तहानलेल्या प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)