शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

मोफत सायकल वाटपास विलंब

By admin | Updated: August 17, 2014 23:16 IST

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे.

बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. जिथे बससेवा पोहचु शकत नाही, तेथील विद्यार्थिनींना मोफत सायकल पुरवठा चालु शैक्षणिक सत्रापासून सुरु केला आहे. मात्र अनुदान मिळून सुद्धा तालुक्यातील काही शाळांनी विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करुन दिल्या नाही. अनुदान लाटण्याचा हा प्रकार तर होणार नाही ना अशी शंका परिसरात वर्तविली जात आहे. राज्य शासनाने १९ जुलै २०११ नुसार सुधारित आणि विस्तारीत मानव विकास कार्यक्रम राज्यातील २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना लागू केला आहे. यामध्ये अर्जुनी/मोर तालुक्याचा सुद्धा समावेश आहे. मानव विकास कार्यक्रमात १३ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यात शिक्षण विभागाचा समावेश आहे. तालुका स्तरावर मानव विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांस महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. ते तालुका मानव विकास समितीचे अध्यक्ष असतात. सदर कार्यक्रमाची तालुक्यात अंमलबजावणी होते काय याकडे संबंधितांनी तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ती तत्परता आजतरी दिसून येत नाही. ग्रामीण भागातील कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी मुलींना १२ वी पर्यंतचे शिक्षण सहज उपलब्ध करुन देण्यात आले. तालुकास्तरावर काही नामांकित शाळा सोडल्या तर उर्वरित शाळेतील मुलींना मानव विकास कार्यक्रमाच्या बससेवेचा लाभ होताना दिसत आहे. शाळांपासून काही अंतरावर मुली ये-जा करतात. जिथे बससेवा पोहचत नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थिनींना मोफत सायकल पुरविण्याचा उपक्रम मानव विकास कार्यक्रमाच्यावतीने सुरु आहे. तालुक्यातील ३० शाळांमधील ६६६ विद्यार्थिनींची सायकल वाटपासाठी निवड करण्यात आली. तीन हजार रुपये प्रती सायकल प्रमाणे ६६६ सायकलींसाठी १९ लाख ९८ हजार रुपयाचे अनुदान तालुक्याला वाटप करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावाने निवड झालेल्या लाभार्थी संख्येनुसार धनादेश सत्राच्या सुरुवातीला (जून) पाठविण्यात आल्याचे पंचायत समिती कार्यालयातून सांगण्यात आले. २ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा विद्यार्थिनींना अजुनपर्यंत सायकल वाटपच करण्यात आल्या नाही अशी पालकांची ओरड आहे. मिळालेल्या माहितीनूसार आजपर्यंत फक्त २१९ सायकल वाटप करण्यात आल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. परंतु शाळांच्या ५० टक्के मुख्याध्यापकांनी सायकल वाटप केल्याचे सध्यातरी दिसून येत नाही. तालुकास्तरावरील मानव विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)