शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मोफत सायकल वाटपास विलंब

By admin | Updated: August 17, 2014 23:16 IST

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे.

बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. जिथे बससेवा पोहचु शकत नाही, तेथील विद्यार्थिनींना मोफत सायकल पुरवठा चालु शैक्षणिक सत्रापासून सुरु केला आहे. मात्र अनुदान मिळून सुद्धा तालुक्यातील काही शाळांनी विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करुन दिल्या नाही. अनुदान लाटण्याचा हा प्रकार तर होणार नाही ना अशी शंका परिसरात वर्तविली जात आहे. राज्य शासनाने १९ जुलै २०११ नुसार सुधारित आणि विस्तारीत मानव विकास कार्यक्रम राज्यातील २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना लागू केला आहे. यामध्ये अर्जुनी/मोर तालुक्याचा सुद्धा समावेश आहे. मानव विकास कार्यक्रमात १३ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यात शिक्षण विभागाचा समावेश आहे. तालुका स्तरावर मानव विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांस महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. ते तालुका मानव विकास समितीचे अध्यक्ष असतात. सदर कार्यक्रमाची तालुक्यात अंमलबजावणी होते काय याकडे संबंधितांनी तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ती तत्परता आजतरी दिसून येत नाही. ग्रामीण भागातील कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी मुलींना १२ वी पर्यंतचे शिक्षण सहज उपलब्ध करुन देण्यात आले. तालुकास्तरावर काही नामांकित शाळा सोडल्या तर उर्वरित शाळेतील मुलींना मानव विकास कार्यक्रमाच्या बससेवेचा लाभ होताना दिसत आहे. शाळांपासून काही अंतरावर मुली ये-जा करतात. जिथे बससेवा पोहचत नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थिनींना मोफत सायकल पुरविण्याचा उपक्रम मानव विकास कार्यक्रमाच्यावतीने सुरु आहे. तालुक्यातील ३० शाळांमधील ६६६ विद्यार्थिनींची सायकल वाटपासाठी निवड करण्यात आली. तीन हजार रुपये प्रती सायकल प्रमाणे ६६६ सायकलींसाठी १९ लाख ९८ हजार रुपयाचे अनुदान तालुक्याला वाटप करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावाने निवड झालेल्या लाभार्थी संख्येनुसार धनादेश सत्राच्या सुरुवातीला (जून) पाठविण्यात आल्याचे पंचायत समिती कार्यालयातून सांगण्यात आले. २ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा विद्यार्थिनींना अजुनपर्यंत सायकल वाटपच करण्यात आल्या नाही अशी पालकांची ओरड आहे. मिळालेल्या माहितीनूसार आजपर्यंत फक्त २१९ सायकल वाटप करण्यात आल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. परंतु शाळांच्या ५० टक्के मुख्याध्यापकांनी सायकल वाटप केल्याचे सध्यातरी दिसून येत नाही. तालुकास्तरावरील मानव विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)