शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांत अतिवृष्टी

By admin | Updated: July 9, 2016 01:57 IST

गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात ....

जिल्हाभर संततधार : आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, गोरेगावात पाणीच पाणीगोंदिया : गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा व गोरेगाव तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे तिथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै २०१६ या कालावधीत सरासरी २८३.९ मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवार ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात ८५.८ मिमी, आमगाव तालुक्यात ६९.३ मिमी, सालेकसा तालुक्यात ९३ मिमी आणि सडक-अर्जुनी तालुक्यात ७६.८ मिमी पाऊस पडल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा आहे. त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका २८७.५ मिमी (४१.१), गोरेगाव तालुका २५७.४ मिमी (८५.८), तिरोडा तालुका २३०.६ मिमी (४६.२), अर्जुनी-मोरगाव तालुका १९१.६ मिमी (३८.३), देवरी तालुका १८६ मिमी (६२), आमगाव तालुका २७७.२ मिमी (६९.३), सालेकसा तालुका २७९ मिमी (९३) व सडक-अर्जुनी तालुक्यात २३०.५ मिमी (७६.८) पाऊस पडला आहे. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस गोंदिया तालुक्यात तर सर्वात कमी देवरी तालुक्यात झाल्याचे दिसून येते.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैच्या सकाळी ८.३० वाजतापर्यंत काही भागात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जनतेने सतर्क राहून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे काही छोट्या नाल्यांना पूर आला. त्यामुळे एसटीच्या काही गाड्यांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी)धरणांचे बूड झाकलेयावर्षी उन्हाळ्यात अनेक मोठे जलाशय कोरडे झाले होते. गेल्या आठवडाभरातील पाण्यामुळे मोठ्या धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात ३१८.८५ दलघमी क्षमतेच्या इटियाडोह धरणात ४९.२५, शिरपूर जलाशयात (क्षमता १९२.५६ दलघमी) १८.६१ दलघमी, पुजारीटोला धरणात (क्षमता ४८.६९ दलघमी) ४.०६ दलघमी, कालीसराडमध्ये (क्षमता २७.७५ दलघमी) साठा निरंक आहे. याशिवाय संजय सरोवराची क्षमता ४१० दलघमी असून आजचा साठा ३६.८८ दलघमी आहे.रोवणीला खोळंबायावर्षी पाऊस लांबल्यामुळे भातपिकाची नर्सरी आणि पर्यायाने रोवणीही खोळंबली होती. परंतू गेल्या आठवडाभरापासून दररोज येत असलेल्या पावसाच्या सरींमुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीला जेमतेम सुरूवात केली होती. परंतू गुरूवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुन्हा रोवण्या खोळंबल्या आहेत.