शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

चार तालुक्यांत अतिवृष्टी

By admin | Updated: July 9, 2016 01:57 IST

गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात ....

जिल्हाभर संततधार : आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, गोरेगावात पाणीच पाणीगोंदिया : गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा व गोरेगाव तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे तिथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै २०१६ या कालावधीत सरासरी २८३.९ मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवार ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात ८५.८ मिमी, आमगाव तालुक्यात ६९.३ मिमी, सालेकसा तालुक्यात ९३ मिमी आणि सडक-अर्जुनी तालुक्यात ७६.८ मिमी पाऊस पडल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा आहे. त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका २८७.५ मिमी (४१.१), गोरेगाव तालुका २५७.४ मिमी (८५.८), तिरोडा तालुका २३०.६ मिमी (४६.२), अर्जुनी-मोरगाव तालुका १९१.६ मिमी (३८.३), देवरी तालुका १८६ मिमी (६२), आमगाव तालुका २७७.२ मिमी (६९.३), सालेकसा तालुका २७९ मिमी (९३) व सडक-अर्जुनी तालुक्यात २३०.५ मिमी (७६.८) पाऊस पडला आहे. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस गोंदिया तालुक्यात तर सर्वात कमी देवरी तालुक्यात झाल्याचे दिसून येते.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैच्या सकाळी ८.३० वाजतापर्यंत काही भागात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जनतेने सतर्क राहून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे काही छोट्या नाल्यांना पूर आला. त्यामुळे एसटीच्या काही गाड्यांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी)धरणांचे बूड झाकलेयावर्षी उन्हाळ्यात अनेक मोठे जलाशय कोरडे झाले होते. गेल्या आठवडाभरातील पाण्यामुळे मोठ्या धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात ३१८.८५ दलघमी क्षमतेच्या इटियाडोह धरणात ४९.२५, शिरपूर जलाशयात (क्षमता १९२.५६ दलघमी) १८.६१ दलघमी, पुजारीटोला धरणात (क्षमता ४८.६९ दलघमी) ४.०६ दलघमी, कालीसराडमध्ये (क्षमता २७.७५ दलघमी) साठा निरंक आहे. याशिवाय संजय सरोवराची क्षमता ४१० दलघमी असून आजचा साठा ३६.८८ दलघमी आहे.रोवणीला खोळंबायावर्षी पाऊस लांबल्यामुळे भातपिकाची नर्सरी आणि पर्यायाने रोवणीही खोळंबली होती. परंतू गेल्या आठवडाभरापासून दररोज येत असलेल्या पावसाच्या सरींमुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीला जेमतेम सुरूवात केली होती. परंतू गुरूवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुन्हा रोवण्या खोळंबल्या आहेत.