शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कालीमाटीवासीयांना अन्न-पाणी झाले कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

गावातील तरुण चार मुले नदीत वाहून गेली व उशिरापर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघ्या गावातच शोककळा पसरली होती. आता माहिती मिळणार हीच धाकधूक मनात ठेवून कालीमाटीवासी व वाहून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय टक लावून बसले होते. सणाचा दिवस दु:खात बदलला व घराघरांत शिजलेले अन्न कुणाच्याही पोटात गेले नाही. दिवसभर जो-तो या घटनेवर दु:ख व्यक्त करीत होता.

राजीव फुंडेलोकमत न्यूज नेटवर्ककालीमाटी :  मारबत हालकण्यासाठी गेलेली गावातील चार मुले नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने गावातील घराघरांत शोककळा पसरली. माहिती मिळताच गावकरी नदीच्या दिशेने पळाले. उशिरापर्यंत त्या मुलांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघे गाव दु:खात लोटले. गावातील तरुण मुले वाहून गेल्याच्या घटनेमुळे मारबतचा उत्साह विरून गेला व कालीमाटीवासीयांना अन्न-पाणी कडू झाले. आमगाव तालुक्यातील कालीमाटी हे गाव तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. विविध जाती-धर्माचे लोक या गावात गुण्या-गाेविंदाने राहतात. सण, उत्सव, मेळावे, समाजातील चालीरीती व परंपरा एकोप्याने साजरी करतात. तान्हा पाेळ्याचा दिवस मारबत म्हणून साजरा करताना गावातील शेकडो मुले ‘घेऊन जागे मारबतचा’ जल्लाेष करीत घरातून गावातील शिवारावर गेली. परंतु, नदीत घडलेल्या घटनेमुळे दहशत घेऊन काही मुले घरी परतली, तर काही लोक नदीकाठावर राहून मदतीची याचना करीत होते. गावातील तरुण चार मुले नदीत वाहून गेली व उशिरापर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघ्या गावातच शोककळा पसरली होती. आता माहिती मिळणार हीच धाकधूक मनात ठेवून कालीमाटीवासी व वाहून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय टक लावून बसले होते. सणाचा दिवस दु:खात बदलला व घराघरांत शिजलेले अन्न कुणाच्याही पोटात गेले नाही. दिवसभर जो-तो या घटनेवर दु:ख व्यक्त करीत होता. नदीत अंघोळ करायला गेलेली मुले सुखरूप घरी न परतल्याने घरातील सर्वजण आक्रोश करीत अश्रू ढाळत होते. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कालीमाटी व परिसरातील गावेही दु:खात बुडाली होती व सर्वत्र शांतता पसरली होती. ऐकू येत होता तो फक्त त्या चार मुलांच्या घरातील सदस्यांच्या ढसाढसा रडण्याचा आवाज.

 

टॅग्स :floodपूर