शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

उड्डाण पुलाचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: September 16, 2015 02:28 IST

शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे.

रेल्वेला निधी अप्राप्त : अंडरग्राऊंड केबल हटविण्याचे काम रेल्वेने केले बंदगोंदिया : शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे काम बंद आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेला निधी देणे गरजेचे होते. परंतु निधी न मिळाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने केबल हटविण्याचे आपले काम थांबविले आहे.शहराच्या हड्डीटोलीजवळ हा उड्डाण पूल बनविण्यात येत आहे. हा उड्डाण पूल तयार करण्याचा उद्देश म्हणजे या मार्गावर तिरोडा-बालाघाटच्या दिशांनी येणाऱ्या अवजड वाहनांना शहराच्या बाहेरूनच आमगाव व कोहमारा मार्गावर रवाना करणे व त्यामुळे अवजड वाहनांचा प्रवेश शहरात होणार नाही, असे आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या अपघातांच्या संख्येत कमी येईल व योग्य वेळी अवजड वाहने आपल्या ठिकाणी पोहोचू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या बांधकामासाठी राज्य शासनाने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. प्रत्यक्षात ३० कोटी ५६ लाख ३० हजार ९५९ रूपयांचा करारनामा करण्यात आला आहे. करारनाम्यानुसार २४ महिन्यांत म्हणजे १६ मे २०१६ पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. बालाघाटच्या दिशेकडे ४४६ मीटर व कोहमाराच्या दिशेकडे ५४६ मीटर लांब मार्ग त्याअंतर्गत बनविण्यात येणार आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१४-१५ दरम्यान १७.१५ कोटी रूपये व आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९.७४ कोटी रूपयांचे काम झाले आहे. आतापर्यंत २६.८९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सन २०१५-१६ मध्ये ३.८८ कोटी रूपये खर्चाची तरतूद शासनाने केली आहे. मात्र २१ कोटी रूपयांची मागणी शासनाकडून करण्यात आली आहे. ज्या गतीने सदर कामाची सुरूवात झाली होती, त्यावरून लवकरच वेळेच्या आत काम पूर्ण होईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु शासनाने बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून काम थंडबस्त्यात असून आतापर्यंत काम सुरू होण्याची चिन्हेसुद्धा दिसून येत नाही. (प्रतिनिधी)