शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

पाच गावे रात्रभर अंधारात

By admin | Updated: May 15, 2015 00:52 IST

बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा

गोंदिया : बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण रात्र नागरिकांना उष्णतेच्या त्रासात, डासांच्या प्रकोपात व अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांना नळाच्या पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागले.बुधवारी सांयकाळी थोड्या प्रमाणात पाऊस व वारा आला. त्यामुळे सुरूवातीला तिरोडा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. एवढेच नव्हे तर तिरोडा शहारातीलही वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र तिरोडा शहरातील वीज पुरवठा अवघ्या एका तासाच्या आतच पूर्ववत झाला. अनेक गावांतीलसुद्धा वीज पुरवठा थोड्या कालावधीनंतर पूर्ववत सुरू झाला. मात्र चिरेखनी, तिरोडा रेल्वे चौकी, बस स्थानक परिसर, लोधीटोला, भुराटोला आदी गावांत तब्बल १८ तासांपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे या गावांतील नागरिकांना रात्रभर अंधारात राहून डासांचा व उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला. अनेकांनी संपूर्ण रात्र जागूनच काढली. अंधारात इतर सरपटणारे जीवजंतू घरात किंवा परिसरात शिरण्याची शक्यता असते. त्याची भीतीसुद्धा नागरिकांच्या मनात होती. शिवाय गरम झालेल्या जमिनीतून सायंकाळी पाऊस आल्याने वाफ निघत असल्याने संपूर्ण रात्र उष्णतेत काढावी लागल्याचे नागरिक सांगतात.दरम्यान रात्री अनेकांनी ग्रामीण विद्युत कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधून वीज पुरवठा कधी सुरू होणार, याची विचारणा केली. मात्र बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे. अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरू होईल, असे वीज कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु एक तास, दोन तास असे करीत संपूर्ण रात्र लोटून गेली, मात्र विद्युत पुरवठा सुरू होवू शकला नाही. विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे पाच गावांतील हजारो नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागल्याची चर्चा तिरोडा तालुक्यातील गावागावांत आहे. यानंतर काही गावांत दुसऱ्या दिवसी गुरूवारी दुपारी १२ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला होता. तर काही ठिकाणी दुपारी चार वाजतानंतरही वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेकांचे मोबाईलसुद्धा बॅटरी चार्जिंगअभावी ठप्प पडले होते. त्यामुळे संपर्क साधने बंद पडले होते. विद्युतवर चालणारी अनेक उपकरणे घराघरांत बंद होते. या प्रकारामुळे नागरिकांनी विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)