शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावे रात्रभर अंधारात

By admin | Updated: May 15, 2015 00:52 IST

बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा

गोंदिया : बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण रात्र नागरिकांना उष्णतेच्या त्रासात, डासांच्या प्रकोपात व अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांना नळाच्या पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागले.बुधवारी सांयकाळी थोड्या प्रमाणात पाऊस व वारा आला. त्यामुळे सुरूवातीला तिरोडा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. एवढेच नव्हे तर तिरोडा शहारातीलही वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र तिरोडा शहरातील वीज पुरवठा अवघ्या एका तासाच्या आतच पूर्ववत झाला. अनेक गावांतीलसुद्धा वीज पुरवठा थोड्या कालावधीनंतर पूर्ववत सुरू झाला. मात्र चिरेखनी, तिरोडा रेल्वे चौकी, बस स्थानक परिसर, लोधीटोला, भुराटोला आदी गावांत तब्बल १८ तासांपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे या गावांतील नागरिकांना रात्रभर अंधारात राहून डासांचा व उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला. अनेकांनी संपूर्ण रात्र जागूनच काढली. अंधारात इतर सरपटणारे जीवजंतू घरात किंवा परिसरात शिरण्याची शक्यता असते. त्याची भीतीसुद्धा नागरिकांच्या मनात होती. शिवाय गरम झालेल्या जमिनीतून सायंकाळी पाऊस आल्याने वाफ निघत असल्याने संपूर्ण रात्र उष्णतेत काढावी लागल्याचे नागरिक सांगतात.दरम्यान रात्री अनेकांनी ग्रामीण विद्युत कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधून वीज पुरवठा कधी सुरू होणार, याची विचारणा केली. मात्र बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे. अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरू होईल, असे वीज कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु एक तास, दोन तास असे करीत संपूर्ण रात्र लोटून गेली, मात्र विद्युत पुरवठा सुरू होवू शकला नाही. विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे पाच गावांतील हजारो नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागल्याची चर्चा तिरोडा तालुक्यातील गावागावांत आहे. यानंतर काही गावांत दुसऱ्या दिवसी गुरूवारी दुपारी १२ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला होता. तर काही ठिकाणी दुपारी चार वाजतानंतरही वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेकांचे मोबाईलसुद्धा बॅटरी चार्जिंगअभावी ठप्प पडले होते. त्यामुळे संपर्क साधने बंद पडले होते. विद्युतवर चालणारी अनेक उपकरणे घराघरांत बंद होते. या प्रकारामुळे नागरिकांनी विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)