शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार कुटुंबांचा प्राधान्य गटात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून मदत करण्यासाठी ‘प्राधान्य कुटुंब योजना’ राबवून जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांना धान्याचा लाभ देण्याकरिता कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेचे एक लक्ष ४३ हजार ७६१ कुटुंबातील सहा लक्ष ७३ हजार ३३२ लाभार्थी व अंत्योदय योजनेत ७८ हजार ४५७ कुटुंबातील तीन लक्ष ४९ हजार २६ लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहेत; परंतु कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे या कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेत तब्बल २० हजार नागरिकांना धान्य प्राप्त होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत कालबद्ध कार्यक्रम राबवून सर्व तालुक्यात गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात येईल. जिल्ह्यात रेशनकार्डद्वारे अन्नधान्याचा लाभ घेणारे एकूण दोन लक्ष २२ हजार २१८ कुटुंबांतील १० लक्ष २२ हजार ३५८ लाभार्थी आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात आर्थिक उत्पन्नाचा फटका बसलेल्या समाजातील गरजू घटकांना प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्याकरिता शिधापत्रिका तयार करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात संपर्क साधावा आणि योग्य तो अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी खवले यांनी कळविले आहे.

------------------------

शिधापत्रिकांसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजना राबविण्याकरिता तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याकरिता कालबद्ध कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. यात, १२ ते १७ जुलैदरम्यान शिधापत्रिका तयार करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, नाव दुरुस्ती करणे, नाव कमी करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येईल. यानंतर १९ ते ३१ जुलैदरम्यान अर्जांची छाननी करण्यात येईल, तसेच २ ते ६ ऑगस्टदरम्यान अर्जदारांना शिधापत्रिका वितरित करण्यासंबंधी कार्यवाही व ७ ते १३ ऑगस्टदरम्यान केलेल्या कारवाईसंदर्भात अहवाल सादर करण्याकरिता सर्व तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत.