शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

पाच हजार कुटुंबांचा प्राधान्य गटात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून मदत करण्यासाठी ‘प्राधान्य कुटुंब योजना’ राबवून जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांना धान्याचा लाभ देण्याकरिता कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेचे एक लक्ष ४३ हजार ७६१ कुटुंबातील सहा लक्ष ७३ हजार ३३२ लाभार्थी व अंत्योदय योजनेत ७८ हजार ४५७ कुटुंबातील तीन लक्ष ४९ हजार २६ लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहेत; परंतु कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे या कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेत तब्बल २० हजार नागरिकांना धान्य प्राप्त होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत कालबद्ध कार्यक्रम राबवून सर्व तालुक्यात गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात येईल. जिल्ह्यात रेशनकार्डद्वारे अन्नधान्याचा लाभ घेणारे एकूण दोन लक्ष २२ हजार २१८ कुटुंबांतील १० लक्ष २२ हजार ३५८ लाभार्थी आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात आर्थिक उत्पन्नाचा फटका बसलेल्या समाजातील गरजू घटकांना प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्याकरिता शिधापत्रिका तयार करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात संपर्क साधावा आणि योग्य तो अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी खवले यांनी कळविले आहे.

------------------------

शिधापत्रिकांसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजना राबविण्याकरिता तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याकरिता कालबद्ध कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. यात, १२ ते १७ जुलैदरम्यान शिधापत्रिका तयार करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, नाव दुरुस्ती करणे, नाव कमी करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येईल. यानंतर १९ ते ३१ जुलैदरम्यान अर्जांची छाननी करण्यात येईल, तसेच २ ते ६ ऑगस्टदरम्यान अर्जदारांना शिधापत्रिका वितरित करण्यासंबंधी कार्यवाही व ७ ते १३ ऑगस्टदरम्यान केलेल्या कारवाईसंदर्भात अहवाल सादर करण्याकरिता सर्व तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत.