शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार कुटुंबांचा प्राधान्य गटात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून मदत करण्यासाठी ‘प्राधान्य कुटुंब योजना’ राबवून जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांना धान्याचा लाभ देण्याकरिता कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेचे एक लक्ष ४३ हजार ७६१ कुटुंबातील सहा लक्ष ७३ हजार ३३२ लाभार्थी व अंत्योदय योजनेत ७८ हजार ४५७ कुटुंबातील तीन लक्ष ४९ हजार २६ लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहेत; परंतु कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे या कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेत तब्बल २० हजार नागरिकांना धान्य प्राप्त होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत कालबद्ध कार्यक्रम राबवून सर्व तालुक्यात गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात येईल. जिल्ह्यात रेशनकार्डद्वारे अन्नधान्याचा लाभ घेणारे एकूण दोन लक्ष २२ हजार २१८ कुटुंबांतील १० लक्ष २२ हजार ३५८ लाभार्थी आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात आर्थिक उत्पन्नाचा फटका बसलेल्या समाजातील गरजू घटकांना प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्याकरिता शिधापत्रिका तयार करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात संपर्क साधावा आणि योग्य तो अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी खवले यांनी कळविले आहे.

------------------------

शिधापत्रिकांसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजना राबविण्याकरिता तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याकरिता कालबद्ध कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. यात, १२ ते १७ जुलैदरम्यान शिधापत्रिका तयार करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, नाव दुरुस्ती करणे, नाव कमी करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येईल. यानंतर १९ ते ३१ जुलैदरम्यान अर्जांची छाननी करण्यात येईल, तसेच २ ते ६ ऑगस्टदरम्यान अर्जदारांना शिधापत्रिका वितरित करण्यासंबंधी कार्यवाही व ७ ते १३ ऑगस्टदरम्यान केलेल्या कारवाईसंदर्भात अहवाल सादर करण्याकरिता सर्व तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत.