शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाच महसूल मंडळे आॅनलाईनपासून वंचित

By admin | Updated: November 16, 2016 01:17 IST

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल आदी साहित्यांचा पुरवठा महसूल विभागाकडून करण्यात आला.

गोंदिया : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल आदी साहित्यांचा पुरवठा महसूल विभागाकडून करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील अनेक साज्यातून शेतकरी व नागरिकांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. शिवाय अनेक नागरिकांचे ई-फेरफार कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्याच्या महसूल मंडळातील पाच मंडळे अद्यापही आॅनलाईन होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे नागरिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात एकूण ३३ महसूल मंडळे आहेत. या महसूल मंडळांमध्ये एकूण ९४६ गावांचा समावेश आहे. यापैकी २८ मंडळे आॅनलाईन झाली आहेत. तर पाच मंडळांमध्ये कनेक्टिव्हिटी प्राब्लेम व इतर तांत्रिक अडचणींमुळे तेथील आॅनलाईन प्रक्रिया रखडली आहे. यात गोंदिया तालुक्यातील रतनारा व खमारी, तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव, आमगाव तालुक्यातील तिगाव व कट्टीपार या पाच गावांचा समावेश आहे.शासनाच्या आदेशाने सर्व मंडळे आॅनलाईन केली जात आहेत. मॅन्युअल फेरफार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना समस्या होवू नये यासाठी नवीन साफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. त्यात महसूल विभागाशी संबंधित कामांची डाटा एन्ट्री सुरू आहे. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॅप, प्रिंटर, नेटसाठी डोंगल, त्यासाठी दरमहा ७५० रूपये व जिल्हा सेतू संस्थेकडून आॅपरेटर्ससुद्धा पुरविण्यात आले आहेत. नवीन साफ्टवेअरच्या एडिट मॉड्युलमध्ये जावून संबंधित माहिती भरली जात आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत तलाठ्यांना देण्यात आली आहे. परंतु जिल्हाभरातील अनेक तलाठ्यांनी फेरफारचे कामच केले नसल्याचे समजते. कनेक्टिव्हिटीची समस्या उद्भवत असल्याने अनेकांचे संगणीकृत सातबारा, ८ अ, ई-फेरफार व त्यात दुरूस्तीचे काम रखडल्याचे तलाठ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक नागरिक व शेतकरी अडचणीत आले आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने ई-फेरफारमधील अडचणी, नेट कनेक्टिव्हिटी-स्पीड, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची पुनर्रचना, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये बांधून देणे, थकीत घरभाडे मंजूर करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत संपूर्ण तलाठी बुधवार दि.१६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात (सामूहिक रजा) सहभागी होत आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्यासाठी तलाठ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन या प्रस्तावित संपाची माहिती दिली.