शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरू

By admin | Updated: August 25, 2015 02:28 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले होते. नुकसान भरपाई

काचेवानी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने तिरोडा तालुक्यासाठी ४ कोटी ९५ लाख रूपये मंजूर केले आहे. नुकसान ग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी महसूल विभागाला दिले आहेत.फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात तिरोडा तालुक्यातील शेतकरी सापडले होते. जिरायती व बागायती पिकांचे मोठेच नुकसान झाले होते. तालुक्यातील १२५ गावांना याचा फटका बसला होतो. तर १२ हजार २९९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. जिरायती शेतातील गहू, हरभरा, जवस व इतर तसेच बागायती पिकांमध्ये भाजीपाला आदी पिके संपूर्ण नष्ट झाली होती. भरपाई त्वरित मिळण्यासाठी शेतकरी सतत पाठपुरावा करीत होते. याची दखल तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी घेऊन राज्य शासनाकडून तिरोडा तालुक्यासाठी चार कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर करून आणला. अवकाळी पाऊस व गारपीट यात ज्यांच्या शेतातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी १० हजार रूपये (एकरी चार हजार रूपये) दिले जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व त्यांना देय असणारी रकमेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीला यादी मिळाली नसेल त्यांनी त्वरित न्यावे, असे आ. विजय रहांगडाले यांनी सांगितले.सर्वाधिक नुकसानग्रस्त भागात अर्जुनी क्षेत्राचा समावेश आहे. तसेच नुकसानग्रस्त गावांमध्ये घाटकुरोडा १९४ हेक्टर (१९.४० लाख), सोनेगाव १४७.२७ हेक्टर (१४.७२ लाख), चांदोरी (बु.) १२० हेक्टर (१२ लाख), कवलेवाडा ११४ हेक्टर (११.४० लाख), मेंढा १११ हेक्टर (११.१० लाख), परसवाडा ९० हेक्टर (नऊ लाख), गोंडमोहाळी ८१ हेक्टर (८.१० लाख), भजेपार ६१ हेक्टर (६.१० लाख) व सुकडी-डाकराम ६३.३६ हेक्टर (६.३४ लाख) एवढे रूपये मिळणार आहेत. सर्वात कमी नुकसान दर्शविण्यात आले, त्यात चोरखमारा ०.२० हेक्टर, भुराटोला १.२० हेक्टर, पुजारीटोला एक हेक्टर व भोंभोडी येथे २० हेक्टरचा समावेश आहे. भोंभोडी येथे नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २०० आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी बंँक खाते तपासावे४शेतकऱ्यांनी उसनवारीने पैसे घेऊन कर्जबाजारी होऊन शेतीची कामे पूर्ण केली. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भरपाई रक्कम देण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्याला वेठीस धरण्यात येईल. ५० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून आठ दिवसात पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासावे, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले आहे.मी शेतकऱ्याचा मुलगा असून मला शेती व शेतकऱ्याचा अनुभव आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकरी विशेषकरून तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील शेतकरी दीन-दुबळ्याचे जीवन जगत आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही दु:ख, समस्या व अडचणी सरकार दरबारी ठेवून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार.’’-आ. विजय रहांगडाले,विधानसभा क्षेत्र, तिरोडा-गोरेगाव.