शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

आठ दिवसांत प्रथमच रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST

गोंदिया : विदर्भात मागील आठ- दहा दिवसांपासून कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ...

गोंदिया : विदर्भात मागील आठ- दहा दिवसांपासून कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. सोमवारी (दि.२२) जिल्ह्यात प्रथमच १४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील आठ- दहा दिवसांतील सर्वाधिक आकडा असल्याने जिल्हावासियांनासुध्दा अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क,सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास प्रशासनाकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असताना सोमवारी रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याने ही बाब काळजी वाढविणारी आहे. मागील आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाच ते सहा दरम्यान होती. मात्र, सोमवारी प्रथमच १४ बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ही जिल्हावासियांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी १४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १३ आणि सालेकसा तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६९०१९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५७३०९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६७६८४ जणांचे स्वॅबनमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६१५१९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४३३९ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४०९३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

................

कोरोना रिकव्हरी दर ९८.२८ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी दर ९८.२८ टक्के आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही जिल्ह्यांत वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हावासियांनी काळजी घेतल्यास निश्चितच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.