शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

आठ दिवसांत प्रथमच रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST

गोंदिया : विदर्भात मागील आठ- दहा दिवसांपासून कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ...

गोंदिया : विदर्भात मागील आठ- दहा दिवसांपासून कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. सोमवारी (दि.२२) जिल्ह्यात प्रथमच १४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील आठ- दहा दिवसांतील सर्वाधिक आकडा असल्याने जिल्हावासियांनासुध्दा अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क,सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास प्रशासनाकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असताना सोमवारी रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याने ही बाब काळजी वाढविणारी आहे. मागील आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाच ते सहा दरम्यान होती. मात्र, सोमवारी प्रथमच १४ बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ही जिल्हावासियांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी १४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १३ आणि सालेकसा तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६९०१९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५७३०९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६७६८४ जणांचे स्वॅबनमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६१५१९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४३३९ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४०९३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

................

कोरोना रिकव्हरी दर ९८.२८ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी दर ९८.२८ टक्के आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही जिल्ह्यांत वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हावासियांनी काळजी घेतल्यास निश्चितच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.