शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

पहिल्या वर्गात विद्यार्थी ‘शून्य’

By admin | Updated: July 7, 2017 01:29 IST

ग्राम खैरलांजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही ५० वर्षे जुनी शाळा असून या सत्रात मात्र

खैरलांजीची जि.प.शाळा : शाळेला शिक्षक देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : ग्राम खैरलांजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही ५० वर्षे जुनी शाळा असून या सत्रात मात्र पहिल्या वर्गात विद्यार्थी संख्या ‘शून्य’ आहे. यामुळे शाळेतील पहिला वर्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. असे असतानाही केंद्र प्रमुख खोब्रागडे यांनी गावात जाऊन पालकांची समजूत घालण्याचे सौजन्यही दाखविले नाही. शिवाय वरिष्ठांना साधी कल्पनाही दिली नाही. यातून ते किती कर्तव्य तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती येते असे बोलले जात आहे. शाळेत १९ आॅक्टोबर २०१६ रोजी अपघातात एक विद्यार्थी ठार झाला होता. तर त्याची बहीण जखमी झाली होती. प्रकरणी जिल्हा प्रशासनाने शिक्षकांवर ठपका ठेवून तीन शिक्षकांना निलंबीत केले होते. पण शाळेत शिकवायसाठी आजही शिक्षक दिले नाही. यामुळेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या अभ्यासाचा विचार करता त्यांना खाजगी शाळेत बाहेरगावी दाखल केले. यंदा भरतीस पात्र ११ विद्यार्थी होते व सर्वांचे प्रवेश बाहेर करण्यात आले. कित्येकदा शाळा व्यवस्थापन समितीने पत्र व्यवहार, प्रत्यक्ष भेट, आमदार, खासदार यांच्या जनता दरबारात शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी तात्पुरती होकार दिली. मात्र शाळेला शिक्षक न देता लोकप्रतिनिधींच्या शब्दालाही मान दिला नाही. एकीकडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिकवा यासाठी धडपड सुरू असून शिक्षण विभाग जोर देत आहे. तर दुसरीकडे शाळेत शिक्षकच नसताना विद्यार्थ्यांना शिकविणार कोण, एवढी साधी बाब मात्र त्यांच्या लक्षात येत नाही का असा सवाल पालक करीत आहेत. शिक्षणाधिकारी दिल्लीला जाऊन पुरस्कार घेतात. मात्र जिल्ह्यातील शाळेत सुरू असलेल्या या प्रकाराला घेऊन त्यांनी शाळेला भेट दिली नाही असे ही गावकरी बोलू लागले आहेत. शाळेत दोन शिक्षक प्रतिनियुक्तीवर ठेवण्यात आले आहेत. यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊलाल मोहने यांनी सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. करिता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सभापतींनी त्वरीत शाळेत शिक्षक द्यावे अन्यथा सर्व विद्यार्थी काढून बाहेर शिक्षणासाठी पाठविणार असा इशारा पालकांनी दिला आहे. २८ पालकांचे टीसी.साठी अर्ज ४आजघडीला शाळेत पहिलीची विद्यार्थी संख्या ‘शून्य’ असून दुसरीत- ९, तीसरीत-११, चौथीत- १३, पाचवीत-१३, सहावीत- ८ व सातवीत १२ विद्यार्थी आहेत. शाळेत बोटावर मोजण्या एवढी पटसंख्या आज शाळेत आहे. यातही २८ पालकांनी टिसी.साठी मुख्यापकांना अर्ज दिले आहेत. मात्र मुख्याध्यापकांनी पालकांची समजूत घालून टिसी. दिलेली नाही. यामुळे वेळीच शिक्षकांची पुर्तता न केल्यास शाळेला कुलूप लागणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.