शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आर्थिक लाभ निश्चित करावे

By admin | Updated: May 23, 2014 23:57 IST

येत्या शैक्षणिक सत्र २०१४-१५ करिता मुख्याध्यापकांचा भार कमी करुन पोषण आहाराची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे, अर्थात ग्रामीण भागात बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात

शालेय पोषण आहार : निकृष्ट दर्जाचे द्यावे लागणार भोजन; मिळकतीकडे शासनाचे दुर्लक्ष

काचेवानी : येत्या शैक्षणिक सत्र २०१४-१५ करिता मुख्याध्यापकांचा भार कमी करुन पोषण आहाराची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे, अर्थात ग्रामीण भागात बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात येणार्‍या आर्थिक लाभाची तरतूद, अन्न शिजविणार्‍या महिलांना-पुरुषांना देण्यात येणार्‍या मजुरीचा त्यात उल्लेख करण्यात आलेला नाही. यावरुन पोषण आहार बचत गटाला दिला असला तरी त्यांना आर्थिक लाभ किती देण्यात येणार याचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे बचत गट आपल्या लाभाकरिता निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन रक्कम वाचवू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कोणतेही काम किंवा धंदा असो, जेथे काहीतरी फायदा मिळत असेल तेच लोक करतात. परंतु शालेय पोषण आहार बचत गटाला दिल्याने त्यांना आर्थिक लाभ कसा आणि किती देण्यात येणार, याचा खुलासा जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत कोणतेही बचत गट ही जबाबदारी स्वीकारतील, असे दिसून येत नाही. शाळेकडे पोषण आहाराची जबाबदारी असताना धान्य, डाळ, तेल, जीरा, राई, तिखट आणि मिठाची व्यवस्था शासनामार्फत केली जात होती. अशीच व्यवस्था समोरही राहणार आहे. प्राथमिक स्तर एक ते पाचकरिता भाजीपाला आणि र्इंधनाचे खर्च मिळून एक रुपया २१ पैसे आणि वर्ग सहा ते आठकरिता एक रुपया ५९ पैशाची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चात इंधन खर्च, हिरवा भाजीपाला आणि पूरक आहाराची व्यवस्था केली जात होती. अशीच व्यवस्था करावी लागणार, असे शासनाच्या परिपत्रकावरून दिसून येते. याचे कारण म्हणजे आर्थिक लाभांशचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. शाळेकडे ही कामे असल्याने आणि मुख्याध्यापकाकडे जबाबदारी असल्याने प्रति मुलामागे खर्ची घालण्यात येणार्‍या निधीची पूर्णपणे व्यवस्था केली जात होती. जर खर्चात कमी झाले तर स्वत:च्या खिशातून खर्च केले जात होते. रुपयांची बचत होणार नाही, अशी दक्षता घेतली जात होती. मात्र यावेळी पोषण आहार बचत गटाला देण्याचे धोरण आखल्याने व बचत गट स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे मुलांचा खर्च कमी तर आपल्या गटाला लाभांश कसा मिळेल, याकडे लक्ष राहणार असल्याची प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करीत आहेत. अर्थात बचत गटाला पोषण आहार दिल्याने जेवनाची चव पाहिजे तशी मिळणार नाही, अशीही शंका काही पालकांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत पटसंख्येच्या आधारावर जेवण शिजविणार्‍यांना नियुक्त करुन त्यांना एक हजार प्रति महिला परिश्रमिक दिला जात होता. या रोजंदारीत परवडत नसल्यावरसुद्धा भविष्यात आपल्याला याचा लाभ मिळेल या आशेवर त्यांनी कामाला सोडले नाही. यावेळी १० वर्षांपासून कार्यरत अन्न शिजविणार्‍या महिलांना काम सोडून खाली राहण्याची पाळी आली आहे. नवीन परिपत्रकाप्रमाणे शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटाला स्वीकारायची असल्याने आणि नवीन शिजविणार्‍यांची नियुक्ती बचत गटाने करावयाची असल्याने पूर्वीचा पोषण आहार तयार करणार्‍या राहतील किंवा नाही, यावर शंकाच आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील महिला असे कामे करायला इच्छुक आहेत किंवा होतील, असे दिसून येत नाही. ग्रामीण भागात शेतीची कामे आणि अन्य कामांकरिता मजुरांची टंचाई आहे. या कामात ११ वाजतापासून ५ वाजतापर्यंत पोषण आहाराची कामे करावी लागतात. त्यांना प्रतिदिवसाची रोजी ३५ ते ४० रुपये पडते. कोणत्याही कामात किंवा संस्थेत कार्यरत मजूरांना १०० रुपयांच्या आत मजुरी दिली जात नाही. पोषण आहार शिजविण्यार्‍या महिला इतक्या कमी पैशात काम करीत आहेत. (वार्ताहर)