शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांची पंधरा हजारी वाटचाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारी (दि. १६) ५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर १६ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ५० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ३० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव ३, देवरी ७, सडक अर्जुनी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यासह आता इतरही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंसर्गात होतेय वाढ : ५० बाधितांची नोंद, १६ जणांची कोरोनावर मात, जिल्हावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन-चार महिने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यानंतर आता मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,८०५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने कोरोना बाधितांची पंधरा हजारी वाटचाल सुरू झाली असून जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. १६) ५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर १६ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ५० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ३० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव ३, देवरी ७, सडक अर्जुनी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यासह आता इतरही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा केव्हाही आणखी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लगतच्या जिल्ह्यांमध्येसुध्दा कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ८५,७३० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७२,६९६ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ७६,४५२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७०,१५० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,८०५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४,३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १०३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा रिकव्हरी दर अधिक  जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी बाधित रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९६.८५ टक्के असून राज्याचा रिकव्हरी दर ९६.०२ टक्के आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही थोडी दिलासादायक बाब आहे. नागरिकांनो, स्वत:ची आणि कुटुंबीयांची घ्या काळजीजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून नागरिकांचे याकडे होत असलेले दुर्लक्ष हेसुध्दा या मागील एक कारण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिक मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. तसेच स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या