शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘फायबर कंटेनर’ टाकले कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:10 IST

कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचा प्रयोग फसला : पैशांची होताहे नासाडी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे. यातून नगर परिषदेचा प्रयोग तर फसला आहेच, मात्र यावर पैशांचा नासाडा झाल्याचेही बोलले जात आहे.शहरात निघणारा कचरा एकत्र टाकण्यात आल्याने त्याची उचल करताना सफाई कर्मचाºयांनाही त्रास होतो. यामुळे कचºयाचे ओला-सुका असे वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळा टाकण्यात यावा यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’चा प्रयोग केला. यांतर्गत ओला कचरा टाकण्यासाठी ‘हिरवा’ तर सुका कचरा टाकण्यासाठी ‘निळा’ अशा दोन रंगांचे ‘फायबर कंटेनर’ लावण्यात आले. एका लोखंडी साच्यात बसवून हे दोन कंटेनर लावण्यात आले होते. मात्र आज हे कंटेनरच कचºयात पडून असल्याचे बघावयास मिळत आहे.शहरवासीयांच्या सोयीसाठी नगर परिषदेने प्राथमिकस्तरावर हा प्रयोग केला होता. मात्र शहरातील कित्येक भागांत हा प्रयोग फसल्याचे दिसून येत आहे. कित्येक ठिकाणी लोकांनी कंटेनरचा लोखंडी साचाच लंपास केल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी कंटेनरसह कचरा जाळून टाकल्याचेही ऐकीवात आहे. यातून मात्र नगर परिषदेने ज्या उद्देशातून हे कंटेनर लावले त्याची पुर्तता होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ओला-सुका कचरा वर्गीकृत केल्यास त्याची उचल करणे सोपे होते. परिणामी शहर स्वच्छ ठेवण्यास अधीक गती येणार हा नगर परिषदेचा उद्देश होता. मात्र शहरवासीयांनी या प्रयोगालाच माती चारली.लावण्यात आलेल्या या कंटेनरची कित्येक ठिकाणी दुरूस्तीही करण्यात आली. मात्र वारंवार तोच प्रकार घडत असल्यामुळे किती वेळा याकडे लक्ष द्यायचे असा प्रश्न संबंधीतांना पडत आहे. त्यात काही कंटेनरचे लोखंडी साचे लंपास करण्यात आल्याने कंटेनर बसवावे तरी कसे हा प्रश्न पडतो. तर फायबरचे असलेले हे कंटेनर वजनात हलके असल्याने चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुमारे १४ हजारांचे एक जोडस्वच्छता अभियानांतर्गत समिती शहराचे मुल्यांकन करण्यासाठी आली होती तेव्हा नगर परिषदेने हे कंटेनर शहरातील व्यापारी भागात लावले होते. यांतर्गत बाजार भागात २८ कंटेनर प्रायोगीक तत्वावर लावण्यात आले होते. सुमारे १४ हजार रूपयांचे एक जोड असल्याची माहिती असून यावर चार लाखांच्यावर खर्च करण्यात आले. हे कंटेनर लावल्यानंतर लगेच काही भागांत त्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता काही कंटेनर गायब झाले असून, काहींचे लोखंडी साचे लंपास करण्यात आले आहे. तर कित्येक ठिकाणी हे कंटेनर खुद्द कचºयात पडून आहेत. एकंदर नगर परिषदेचे चार लाख रूपये पाण्यात गेले असेच म्हणावे लागेल.शहरवासीयांच्या सहकार्याची गरजनगर परिषदेने एका चांगल्या उद्देशातून हे कं टेनर शहरात लावले होते. प्रायोगीक तत्वावर जरी फक्त २८ कंटेनर लावले गेले. तरी याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास शहरात प्रभागनिहाय हा प्रयोग केला गेला असता. मात्र नागरिकांनी लावण्यात आलेल्या कंटेनरची चक्क ऐशीतेशी करून या प्रयोगालाच फेल केले. यात नगर परिषदेच्या पैशांचा नासाडा झाला असला तरिही तो पैसा शेवटी लोकांचाच आहे. यामुळे शहरवासीयांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज आहे.