शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

‘फायबर कंटेनर’ टाकले कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:10 IST

कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचा प्रयोग फसला : पैशांची होताहे नासाडी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे. यातून नगर परिषदेचा प्रयोग तर फसला आहेच, मात्र यावर पैशांचा नासाडा झाल्याचेही बोलले जात आहे.शहरात निघणारा कचरा एकत्र टाकण्यात आल्याने त्याची उचल करताना सफाई कर्मचाºयांनाही त्रास होतो. यामुळे कचºयाचे ओला-सुका असे वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळा टाकण्यात यावा यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’चा प्रयोग केला. यांतर्गत ओला कचरा टाकण्यासाठी ‘हिरवा’ तर सुका कचरा टाकण्यासाठी ‘निळा’ अशा दोन रंगांचे ‘फायबर कंटेनर’ लावण्यात आले. एका लोखंडी साच्यात बसवून हे दोन कंटेनर लावण्यात आले होते. मात्र आज हे कंटेनरच कचºयात पडून असल्याचे बघावयास मिळत आहे.शहरवासीयांच्या सोयीसाठी नगर परिषदेने प्राथमिकस्तरावर हा प्रयोग केला होता. मात्र शहरातील कित्येक भागांत हा प्रयोग फसल्याचे दिसून येत आहे. कित्येक ठिकाणी लोकांनी कंटेनरचा लोखंडी साचाच लंपास केल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी कंटेनरसह कचरा जाळून टाकल्याचेही ऐकीवात आहे. यातून मात्र नगर परिषदेने ज्या उद्देशातून हे कंटेनर लावले त्याची पुर्तता होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ओला-सुका कचरा वर्गीकृत केल्यास त्याची उचल करणे सोपे होते. परिणामी शहर स्वच्छ ठेवण्यास अधीक गती येणार हा नगर परिषदेचा उद्देश होता. मात्र शहरवासीयांनी या प्रयोगालाच माती चारली.लावण्यात आलेल्या या कंटेनरची कित्येक ठिकाणी दुरूस्तीही करण्यात आली. मात्र वारंवार तोच प्रकार घडत असल्यामुळे किती वेळा याकडे लक्ष द्यायचे असा प्रश्न संबंधीतांना पडत आहे. त्यात काही कंटेनरचे लोखंडी साचे लंपास करण्यात आल्याने कंटेनर बसवावे तरी कसे हा प्रश्न पडतो. तर फायबरचे असलेले हे कंटेनर वजनात हलके असल्याने चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुमारे १४ हजारांचे एक जोडस्वच्छता अभियानांतर्गत समिती शहराचे मुल्यांकन करण्यासाठी आली होती तेव्हा नगर परिषदेने हे कंटेनर शहरातील व्यापारी भागात लावले होते. यांतर्गत बाजार भागात २८ कंटेनर प्रायोगीक तत्वावर लावण्यात आले होते. सुमारे १४ हजार रूपयांचे एक जोड असल्याची माहिती असून यावर चार लाखांच्यावर खर्च करण्यात आले. हे कंटेनर लावल्यानंतर लगेच काही भागांत त्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता काही कंटेनर गायब झाले असून, काहींचे लोखंडी साचे लंपास करण्यात आले आहे. तर कित्येक ठिकाणी हे कंटेनर खुद्द कचºयात पडून आहेत. एकंदर नगर परिषदेचे चार लाख रूपये पाण्यात गेले असेच म्हणावे लागेल.शहरवासीयांच्या सहकार्याची गरजनगर परिषदेने एका चांगल्या उद्देशातून हे कं टेनर शहरात लावले होते. प्रायोगीक तत्वावर जरी फक्त २८ कंटेनर लावले गेले. तरी याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास शहरात प्रभागनिहाय हा प्रयोग केला गेला असता. मात्र नागरिकांनी लावण्यात आलेल्या कंटेनरची चक्क ऐशीतेशी करून या प्रयोगालाच फेल केले. यात नगर परिषदेच्या पैशांचा नासाडा झाला असला तरिही तो पैसा शेवटी लोकांचाच आहे. यामुळे शहरवासीयांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज आहे.