शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन होता. उद्योगधंद्यासह मनरेगाची कामेसुद्धा बंद होती. संपूर्ण उन्हाळा ...

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन होता. उद्योगधंद्यासह मनरेगाची कामेसुद्धा बंद होती. संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्येच गेला, तर यंदाही तीच परिस्थिती आहे. मनरेगासह इतरही कामे बंद असल्याने मजुरांना रोजगारासाठी बाहेर उन्हात जाण्याची वेळ आली नाही, तर इतर नागरिकांच्या बाबतीत सुद्धा हीच वास्तविकता आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत उष्माघाताने एकाचाही बळी गेला नाही. केवळ २०१९ मध्ये उष्माघाताने दोन जणांचा बळी गेल्याची नोंद आहे. एकंदरीत मागील वर्षी आणि यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी मार्च ते जूनदरम्यान लॉकडाऊन होता. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. वाहतूक देखील ठप्प असल्याने प्रदूषणात घट होऊन तापमानात सुद्धा वाढ झाली नव्हती. त्यामुळेच उष्माघाताचे रुग्ण वाढले नाहीत. जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते, तर मे महिन्यात तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आतच आहे. त्यामुळे यंदासुद्धा फारसा उन्हाळा जाणवला नाही.

............

ऊन वाढले तरी

यंदा एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे मे महिन्यात काय होणार, अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. कारण, या कालावधीत मनरेगाची कामे, तेंदुपत्ता व मोहफुल वेचण्याचा हंगाम असतो. यासाठी ग्रामीण भागातील मजूरवर्ग रोजगारासाठी बाहेर जात असतो. दिवसभर ऊन अंगावर घेऊन काम करतो. मात्र, यंदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने ही सर्व कामे बंद असल्याने वाढत्या तापमानाचा फारसा परिणाम झाला नाही, तर उष्माघाताने एकही बळी गेला नाही.

..........

कोरोनामुळे उन्हाळा घरातच

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत मागील महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे व सर्वच व्यवहार ठप्प आहेत, तर नागरिकांना बाहेर फिरण्यास निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाचा उन्हाळा देखील जिल्हावासीयांना घरात घालवावा लागला आहे. त्यामुळे ना उन्हाची समस्या व उष्माघाताचा त्रास झाला नाही. यंदा अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने मे महिन्यातसुद्धा तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होते. अवकाळी पावसामुळे उकाड्याचा त्रास थोड्या प्रमाणात सहन करावा लागला.

...............

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

सन २०१९-२

सन २०२०-०

सन २०२१-०

...................

काेट

मागील वर्षी मार्चपासून काेरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्येच गेला, तर यंदासुद्धा तीच स्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मनरेगासह इतर कामेसुद्धा बंद आहेत. शेतकरी वर्गसुद्धा सकाळच्या सुमारास शेतीची कामे करून घेत आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत उष्माघाताने एकही बळी गेलेला नाही.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.