शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीतून बदलणार जिल्ह्यातील शेतीचे चित्र

By admin | Updated: January 28, 2016 01:42 IST

शेतीकडे दुय्यम व्यवसाय म्हणून बघितले जाते. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

कोदामेडीत कृषी ग्रामसभा : शेतकऱ्यांना देणार ‘स्मार्ट शेती’ करण्याचे तंत्रगोंदिया : शेतीकडे दुय्यम व्यवसाय म्हणून बघितले जाते. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जिल्ह्यात पाण्याची मुबलकता आहे. शेती कशी करावी याचे ज्ञानही आपल्या शेतकऱ्यांना अवगत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता पारंपरिक पद्धतीत बदल करून समृद्ध शेतीचे तंत्र अवलंबवावे, त्यासाठी शेतकऱ्यांना हवे ते मार्गदर्शन दिले जाईल, असे पालकमंत्री राजकुमार बडोले सांगितले.सडक/अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी येथे राज्यातील पहिल्या कृषी ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, अभिनव फार्मा क्लब पुणेचे प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोडखे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, कोदामेडीच्या सरपंच अनिता बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.पूर्वी कोदामेडी व तिडका परिसरात दुधाचे व भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते. आज मात्र शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. गोंदिया जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून पाणीसुध्दा भरपूर आहे. या पाण्याचे नियोजन करून त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी करावा. शेतकऱ्यांनी आता सामुहिक शेतीचा अवलंब करु न गावागावातून भाजीपाला व दूधाची गाडी बाजारपेठेत गेली पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करावे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तिडका आाणि कोदामेडी या दोन्ही गावांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.जि.प. अध्यक्ष मेंढे म्हणाल्या, शेतीची ग्रामसभा हा अभिनव उपक्र म आहे. ही ग्रामसभा शेतकऱ्यांसाठी जीवनदायी आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ धानाच्या पिकावर अवलंबून न राहता नगदी पिकांची शेती करावी. त्यामुळे त्यांच्या जीवनात समृध्दी येईल. अशाप्रकारच्या शेतीतून अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. शेतीविषयक ग्रामसभेमुळे कृषिविषयक योजना प्रभावीपणे राबविता येतील. शेतीच्या ग्रामसभा जिल्हयात झाल्या तर जिल्हयातील शेतकरी कर्जमुक्त होण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)- शेतमालाला बाजारपेठेची गरजअभिनव फार्माचे बोडखे म्हणाले, शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारा वर्ग आहे. शेतीच्या ग्रामसभेतून गावातील शेतकर्यांना शेतीविषयक योजनांची माहिती मिळेल. त्यामुळे भविष्यात शेतकर्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतीत शेतकरी खूप राबतो, पण मेहनतीच फळ त्याला अल्प मिळते असे सांगून बोडखे म्हणाले, आता शेतीतून किती पैसे कमावतो यालाच महत्व राहणार आहे. जिल्ह्यात पाणी मुबलक आहे. या पाण्याचे नियोजन करु न चांगले पीक घेता येईल. उत्पादित माल थेट बाजारपेठेत विकावा. दलालाचा हस्तक्षेप होणार नाही याकडे लक्ष द्यावे. पृथ्वीवर मनुष्य प्राणी जीवंत आहे. तोपर्यंत जगाला शेतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. नियोजनबध्द शेती केली तर गावे शेतीतून समृध्द होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज मल्चिंग पेपरचा वापर शेतीत केला तर खुरपणीचा खर्च वाचणार आहे. गावातील शेतकऱ्यांनी आता सामूहिक पध्दतीने शेती करावी. गीर सारख्या देशी गायी घेऊन त्याच्या दुधाची, गोमूत्राची विक्र ी करावी. चांगले शेणखत या गाईपासून मिळणार असल्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. स्मार्ट शेती करण्याची वेळ आता आली असल्याचे त्यांनी सांगितले.