शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे वेट अ‍ॅन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:45 IST

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. याला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र यानंतरही कर्जमाफीचा घोळ संपला नसून जिल्ह्यातील २० हजारावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.जुने कर्जमाफ झाले नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली ...

ठळक मुद्देखरीप हंगाम संकटात : कर्जमाफीच्या वर्षपूर्तीनंतरही दहावी यादी आलीच नाही

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. याला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र यानंतरही कर्जमाफीचा घोळ संपला नसून जिल्ह्यातील २० हजारावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.जुने कर्जमाफ झाले नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.वर्षभरापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करुन ८२ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आणि बँकांनी दिलेली माहिती न जुडल्याने आॅनलाईन अर्जाची छाननी करुन त्याची ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार केल्या. त्यानंतर टप्प्या टप्याने या याद्या जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाकडे पाठविल्या. आतापर्यंत बँकाना एकूण ८ याद्या प्राप्त झाल्या असून जिल्हा बँकेने एकूण ५२ हजार ६८८ शेतकºयांचे १४० कोटी ५४ लाख रुपयांचे कर्जमाफ केले आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी ७ हजार ८८५ शेतकºयांचे ३५ कोटी ८० लाख आणि ग्रामीण बँकानी ३ हजार ८९४ शेतकऱ्यांचे ११ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्जमाफ केले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारी नजर टाकल्यास २० हजारावर शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.आधी जुने भरा नंतर नवीन मिळेलजे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले त्यापैकी २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. ही रक्कम जर आता शेतकऱ्यांनी भरली तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर बँकेच्या नियमानुसार जोपर्यंत शेतकऱ्यांचे जुने कर्ज फेडले जात नाही तोपर्यंत नवीन पीककर्ज त्याला देता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.हंगाम येणार अडचणीतजिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यातच सरकार कर्जमाफीच्या धोरणात रोज नवीन बदल करीत आहेत. तर दुसरीकडे अजूनही कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे.ग्रीन लिस्ट पाठवण्यिास विलंबकर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. त्या अर्जातील माहिती व बँकांनी दिलेली माहिती याची चाचपणी केली जात आहे. यानंतर माहिती जुडलेले अर्जांचा समावेश ग्रीन यादीत करुन ती यादी बँकाना पाठविली जाते. त्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करतात. मात्र मागील तीन महिन्यापासून शासनाकडून ग्रीन याद्या पाठविण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे बँकांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.