शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी धान खरेदी बंद शेतकरी आले अडचणीत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रात रब्बी धान खरेदी करण्यासाठी मुदतवाढीची घोषणा केली ...

केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रात रब्बी धान खरेदी करण्यासाठी मुदतवाढीची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात संबंधित धान खरेदी केंद्रांना आदेश पाठविले नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रात रब्बी हंगामातील धानाची खरेदी करणे बंद झाले. ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली शेतकऱ्यांची धान केंद्राच्या आवारात पडून आहे. शेतकरी वर्ग अडचणीत आले आहे.

धान खरेदीला मुदत वाढीचे आदेश संबंधित केंद्रांना पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रांना रब्बी हंगामातील धान खरेदी करण्याची मुदत ३० जूनपर्यंत होती. यावर्षी कोरोना संकटामुळे धान खरेदी केंद्र उशिरा सुरु झाल्यामुळे शासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत धान खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल धान्य आधारभूत केंद्राच्या आवारात पडून आहेत. ही मागणी घेऊन शेतकरी खा. प्रफुुल्ल पटेल आणि आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना भेटले. त्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सदर मागणी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला. त्याप्रमाणे शासनाने धान खरेदीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढविल्याची घोषणा केली. परंतु मुदतवाढीचे आदेश आधारभूत केंद्रांना प्राप्त झाले नाही. त्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. ऑनलाइन नोंद केलेली हजारो क्विंटल धान केंद्राच्या आवारात पडली आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्ग फारच अडचणीत सापडला आहे.

..............

आदिवासी विकास महामंडळाने केले हात वर

या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध यांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीचे आदेश माझ्यापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे मी काहीच करु शकत नाही असे म्हणून हात वर केले. याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी विशेष लक्ष देऊन शासनाने धान खरेदीसाठी वाढवून दिलेल्या मुदतीचे आदेश संबंधित आधारभूत धान खरेदी केंद्रांना प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.