शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

केशोरी : या वर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला असून धानाची पेरणी करताना कोणत्याही शेतकऱ्याने घाई करू नये. शेतकरी विनाकारण ...

केशोरी : या वर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला असून धानाची पेरणी करताना कोणत्याही शेतकऱ्याने घाई करू नये. शेतकरी विनाकारण धानाची पेरणी करण्यासाठी अत्यंत घाई करताना दिसून येतात. बियाण्यांची निवड करताना शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असून बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच बी-बियाणे खरेदी करावे, असा सल्ला कृषी सहायक सागर होलगिऱ्हे यांनी दिला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी, शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे, बनावट बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी खासगी अनधिकृत विक्रेत्यांकडून धान बियाणे खरेदी करू नये. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह धान बियाणे खरेदी करावे. पावतीवर धान बियाण्यांचा पूर्ण तपशील असणे आवश्यक आहे. तसेच खरेदी केलेले बियाणे, वेष्ठन, पिशवी टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पाकीट सील व मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावर अंतिम मुदत तपासावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री केल्यास त्याची कृषी विभागाकडे तक्रार करावी. इत्यादी बाबींची शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही होलगिऱ्हे यांनी सांगीतले.