शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: June 24, 2016 00:03 IST

पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही.

गोंदिया : पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही. त्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. आता आर्द्रा नक्षरातही नुसतेच ढग गोळा होऊन हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाच्या आशेने रोपवाटिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. यात तरी चांगला पाऊस पडेल व बियाण्यांची पेरणी करता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा अपेक्षाभंगाचे दु:ख शेतकऱ्यांच्या नशिबी आले. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. आता जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिका लावणे बंद केले असले तरी ज्यांनी आधीच बियाणे टाकले ते वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडी हिंमत आहे.सध्या जिल्ह्यात एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका घालण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस पडेल, तलाव, बोडी भरून जाईल, अशी शेतकऱ्यांची आशा असते. मात्र पावसाच्या या नक्षत्रात उन्हाळ्याचाच भास होत आहे. तीव्र ऊन व उकाड्याने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. मागील वर्षीसुद्धा पावसाने योग्य साथ दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची पाळी आली होती. यंदा तर आणखीच बिकट परिस्थिती दिसून येत आहे. १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर अद्याप पावसाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उगवलेली खार करपण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोपवाटिका उगवलीच नाही. शेतात रोपवाटिकेसाठी टाकलेले दाने पशूपक्षी टीपत आहेत. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे नजरा लावून आहेत. पाऊस येत नसला तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे, ते रोपवाटिकेसाठी बियाणे पेरत आहेत. मात्र जे शेतकरी पूर्णत: वरथेंबी पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी बियाणे पेरणे थांबविलेले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३०.८ मिमी पाऊस झालेला आहे. मात्र रोपवाटिकेसाठी १५० मिमी पावसाची गरज असते. जोपर्यंत १५० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे पेरू नये, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात यंदा चक्रिवादळाने कहर केला. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे रोपवाटिकेचे क्षेत्र सध्या अत्यल्प आहे. गोंदिया तालुक्यात ११९ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ७५० हेक्टरमध्ये, आमगाव ९५, गोरेगाव २४०, सालेकसा १४.५०, देवरी ४२, अर्जुनी-मोरगाव ४८० व सडक-अर्जुनी तालुक्यात १६० हेक्टरमध्ये अशी जिल्ह्यात एकूण एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. केवळ सालेकसा तालुक्यात १२.३० हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय तुरीसारख्या बांधावरच्या पिकांची २७ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.दुबार पेरणीचे संकटकेवळ एकदाच आलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या आहेत. ज्यांनी रोपवाटिकेसाठी बियाणे घातले, उन्हामुळे ते अंकुरीतच झाले नाही. ते दाने पोपट व इतर पक्षी टिपत आहेत. शिवाय ज्यांची रोपवाटिका काही प्रमाणात उगवली आहे, तेथे ओलावा रहावा यासाठी शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी देत आहेत. मात्र पाण्याच्या शोधात रानडुकरे तिथे येवून रोपवाटिका नष्ट करीत आहेत. या सर्व कारणांमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट घोंघावत आहे.