शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: June 24, 2016 00:03 IST

पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही.

गोंदिया : पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही. त्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. आता आर्द्रा नक्षरातही नुसतेच ढग गोळा होऊन हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाच्या आशेने रोपवाटिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. यात तरी चांगला पाऊस पडेल व बियाण्यांची पेरणी करता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा अपेक्षाभंगाचे दु:ख शेतकऱ्यांच्या नशिबी आले. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. आता जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिका लावणे बंद केले असले तरी ज्यांनी आधीच बियाणे टाकले ते वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडी हिंमत आहे.सध्या जिल्ह्यात एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका घालण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस पडेल, तलाव, बोडी भरून जाईल, अशी शेतकऱ्यांची आशा असते. मात्र पावसाच्या या नक्षत्रात उन्हाळ्याचाच भास होत आहे. तीव्र ऊन व उकाड्याने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. मागील वर्षीसुद्धा पावसाने योग्य साथ दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची पाळी आली होती. यंदा तर आणखीच बिकट परिस्थिती दिसून येत आहे. १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर अद्याप पावसाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उगवलेली खार करपण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोपवाटिका उगवलीच नाही. शेतात रोपवाटिकेसाठी टाकलेले दाने पशूपक्षी टीपत आहेत. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे नजरा लावून आहेत. पाऊस येत नसला तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे, ते रोपवाटिकेसाठी बियाणे पेरत आहेत. मात्र जे शेतकरी पूर्णत: वरथेंबी पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी बियाणे पेरणे थांबविलेले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३०.८ मिमी पाऊस झालेला आहे. मात्र रोपवाटिकेसाठी १५० मिमी पावसाची गरज असते. जोपर्यंत १५० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे पेरू नये, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात यंदा चक्रिवादळाने कहर केला. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे रोपवाटिकेचे क्षेत्र सध्या अत्यल्प आहे. गोंदिया तालुक्यात ११९ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ७५० हेक्टरमध्ये, आमगाव ९५, गोरेगाव २४०, सालेकसा १४.५०, देवरी ४२, अर्जुनी-मोरगाव ४८० व सडक-अर्जुनी तालुक्यात १६० हेक्टरमध्ये अशी जिल्ह्यात एकूण एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. केवळ सालेकसा तालुक्यात १२.३० हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय तुरीसारख्या बांधावरच्या पिकांची २७ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.दुबार पेरणीचे संकटकेवळ एकदाच आलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या आहेत. ज्यांनी रोपवाटिकेसाठी बियाणे घातले, उन्हामुळे ते अंकुरीतच झाले नाही. ते दाने पोपट व इतर पक्षी टिपत आहेत. शिवाय ज्यांची रोपवाटिका काही प्रमाणात उगवली आहे, तेथे ओलावा रहावा यासाठी शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी देत आहेत. मात्र पाण्याच्या शोधात रानडुकरे तिथे येवून रोपवाटिका नष्ट करीत आहेत. या सर्व कारणांमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट घोंघावत आहे.