शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: June 24, 2016 00:03 IST

पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही.

गोंदिया : पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही. त्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. आता आर्द्रा नक्षरातही नुसतेच ढग गोळा होऊन हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाच्या आशेने रोपवाटिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. यात तरी चांगला पाऊस पडेल व बियाण्यांची पेरणी करता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा अपेक्षाभंगाचे दु:ख शेतकऱ्यांच्या नशिबी आले. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. आता जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिका लावणे बंद केले असले तरी ज्यांनी आधीच बियाणे टाकले ते वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडी हिंमत आहे.सध्या जिल्ह्यात एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका घालण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस पडेल, तलाव, बोडी भरून जाईल, अशी शेतकऱ्यांची आशा असते. मात्र पावसाच्या या नक्षत्रात उन्हाळ्याचाच भास होत आहे. तीव्र ऊन व उकाड्याने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. मागील वर्षीसुद्धा पावसाने योग्य साथ दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची पाळी आली होती. यंदा तर आणखीच बिकट परिस्थिती दिसून येत आहे. १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर अद्याप पावसाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उगवलेली खार करपण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोपवाटिका उगवलीच नाही. शेतात रोपवाटिकेसाठी टाकलेले दाने पशूपक्षी टीपत आहेत. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे नजरा लावून आहेत. पाऊस येत नसला तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे, ते रोपवाटिकेसाठी बियाणे पेरत आहेत. मात्र जे शेतकरी पूर्णत: वरथेंबी पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी बियाणे पेरणे थांबविलेले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३०.८ मिमी पाऊस झालेला आहे. मात्र रोपवाटिकेसाठी १५० मिमी पावसाची गरज असते. जोपर्यंत १५० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे पेरू नये, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात यंदा चक्रिवादळाने कहर केला. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे रोपवाटिकेचे क्षेत्र सध्या अत्यल्प आहे. गोंदिया तालुक्यात ११९ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ७५० हेक्टरमध्ये, आमगाव ९५, गोरेगाव २४०, सालेकसा १४.५०, देवरी ४२, अर्जुनी-मोरगाव ४८० व सडक-अर्जुनी तालुक्यात १६० हेक्टरमध्ये अशी जिल्ह्यात एकूण एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. केवळ सालेकसा तालुक्यात १२.३० हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय तुरीसारख्या बांधावरच्या पिकांची २७ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.दुबार पेरणीचे संकटकेवळ एकदाच आलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या आहेत. ज्यांनी रोपवाटिकेसाठी बियाणे घातले, उन्हामुळे ते अंकुरीतच झाले नाही. ते दाने पोपट व इतर पक्षी टिपत आहेत. शिवाय ज्यांची रोपवाटिका काही प्रमाणात उगवली आहे, तेथे ओलावा रहावा यासाठी शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी देत आहेत. मात्र पाण्याच्या शोधात रानडुकरे तिथे येवून रोपवाटिका नष्ट करीत आहेत. या सर्व कारणांमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट घोंघावत आहे.