शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

एकत्रित अहवालासाठी रखडली शेतकऱ्यांची मदत

By admin | Updated: December 23, 2016 00:46 IST

शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यावर्षीही खरीप हंगामात पूर, गारपीट व

खरीप हंगामातील नुकसान : यंत्रणेची लालफितशाहीगोंदिया: शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यावर्षीही खरीप हंगामात पूर, गारपीट व अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ६३४.२८ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान होणारा सालेकसा तालुका आहे. त्या पाठोपाठ आमगावचा क्रमांक आहे. देवरी व सडक अर्जुनी या दोन तालुक्यातील नुकसान नगण्य आहे. गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या चार तालुक्यातील एकही नुकसान नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सालेकसा तालुक्यातील ७८४ शेतकऱ्यांचे ४९६.९३ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत ६६ लाख ८४ हजार ४३५ रुपये आहे. आमगाव तालुक्यातील २४८ शेतकऱ्यांचे १२९.९५ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत ८ लाख ८३ हजार ६६० रुपये आहे. देवरी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांचे ३.७० हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत २५ हजार १६० रुपये आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील ११ शेतकऱ्यांचे ३.७० हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत २५ हजार १६० रुपये आहे. या चार तालुक्यातील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या ६३४.२८ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले असून त्याची किमत ७६ लाख १८ हजार ४१५ रुपये आहे. सदर नुकसान जुलै ते नोव्हेंबर या काळातला असून ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणने आहे.(तालुका प्रतिनिधी)