शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पाच तालुक्यातील शेतकरी विम्यापासून वंचित

By admin | Updated: June 19, 2016 01:28 IST

शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून शेतकरी पीक विमा घेतात. परंतु नापिकीमुळे कर्जाचा डोंगर उभा झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारला जात असल्याचा प्रकार....

नरेश रहिले गोंदियाशेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून शेतकरी पीक विमा घेतात. परंतु नापिकीमुळे कर्जाचा डोंगर उभा झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारला जात असल्याचा प्रकार जिल्ह्यात दिसून येतो. मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील १० हजार २९५ शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आला. जिल्ह्यातील ८ पैकी ५ तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा मंजूर करण्यात आला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १०९ गावांना दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले. ज्या गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे अशा गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले जाते. परंतु दुष्काळग्रस्त झालेल्या गावातील ही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. गोंदिया, सालेकसा व गोरेगाव या तीन तालुक्यातील अत्यल्प शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला. परंतु आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व तिरोडा या पाच तालुक्यातील एकही शेतकऱ्याला पीक विमा मंजूर करण्यात आला नाही. गोंदिया तालुक्यातील १६७२ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. परंतु त्यापैकी फक्त २९९ शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले. या शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून २७, ६१३ रुपये ८९ पैसे देण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ८४० शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. परंतु त्यापैकी फक्त २७३ शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले. या शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून १ लाख १६ हजार ४०९ रुपये देण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील ७४१ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. परंतु त्यापैकी फक्त ५१२ शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले. या शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून १४ लाख, ८२ हजार २०५ रुपये देण्यात आले. आमगाव तालुक्यातील ११२३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. देवरी तालुक्यातील ३६६७ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. सडक अर्जुनी तालुक्यातील १२९० शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६६९ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. तर तिरोडा तालुक्यातील १३७७ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. परंतु या पाच ही तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा मंजूर करण्यात आला नाही. जिल्ह्यातील एकूण ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. परंतु त्यातील १ हजार ८४ अर्ज मंजूर करण्यात आले. त्यांना फक्त १६ लाख २६ हजार २२८ रुपये पीक विमा म्हणून देण्यात आला. परंतु १० हजार २९५ शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला नाही. हेक्टरी ३९ हजारांचे पीक विमा संरक्षणमागच्या वर्षीपर्यंत राष्ट्रीय पीक विमा योजना या नावाने शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण देण्यात येत होते. परंतु पंतप्रधान मोदी यांनी या पीक विमा योजनेला पंतप्रधान पीक विमा योजना असे नाव बदलून या योजनेंतर्गत पिकाला हेक्टरी ३९ हजारांचे संरक्षण दिले. यासाठी या रकमेची दोन टक्के रक्कम शेतकऱ्याला पीक विमा संरक्षणासाठी भरावी लागते. म्हणजेच हेक्टरी ३९ हजार रूपये पीक विम्यासाठी शेतकऱ्याला फक्त ७८० रूपये भरावे लागतात. आता वैयक्तिक स्तरावर लाभआधी मंडळ स्तरावर जिल्हा परिषद, महसूल विभाग व कृषी विभाग या तिन्ही यंत्रणांनी आलेल्या कापलेल्या पीकाची पाच वर्षाची सरासरी काढल्यास ६० टक्यापेक्षा कमी उत्पन्न येणाऱ्या मंडळातील पीक विम्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येत होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचे पीक गेले आणि त्या मंडळाची सरासरी ६० टक्याच्या अधिक असेल तरी त्या शेतकऱ्याला पीक विम्याची मदत मिळत नव्हती. आताचा पीक विमा मंडळातील उत्पन्नावर नाही तर वैयक्तीक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर राहणार आहे.