शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, शेतीला समृध्द करा

By admin | Updated: August 18, 2016 00:31 IST

जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

पालकमंत्री बडोले : गंगाझरी येथे जलपूजन कार्यक्र म गोंदिया : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्त अभियानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली असून संरिक्षत सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरीक शेती करण्यापेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला समृध्द करावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गंगाझरी येथे सोमवारी (दि.१५) जलयुक्त शिवार अभियानातून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, माजी आमदार हरीश मोरे, जि.प. सदस्य रमेश अंबुले, पं.स. सदस्य प्रकाश पटले, गंगाझरीच्या सरपंच ममता लिल्हारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर, तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी. मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, पूर्वी आपण पारंपरीक पध्दतीने कडधान्य घेत होतो. पण आज विदेशातून कडधान्याची आयात करण्याची वेळ आली आहे. उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य वापर व त्याची देखभाल ग्रामस्थांनी करावी. पाणी हे जीवन आहे. पाणीसाठा कमी झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाची शेती करावी. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जिल्ह्यात तलाव, जंगल असतानादेखील आता आपण आपल्या मागासलेपणाची ओळख पुसली पाहिजे. अधिकारी व शेतकऱ्यांमधील दुरावा दूर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी व ऐतिहासीक कार्यक्रम आहे. जलयुक्तच्या कामामुळे ९४ पैकी ८० गावांत जास्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. २५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. यावर्षीपासून शेतकऱ्यांनी आता उडीद मुगाचे पीक घ्यावे. उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्याचा उपयोग रबी पिकासाठी करण्यात यावा. यामधून त्यांनी उडीद मुग पिकाची लागवड करावी. पाणीटंचाईपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य रमेश अंबुले, पं.स. सदस्य प्रकाश पटले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी सांगितले, गंगाझरीत जलयुक्तमधून ४० कामे करण्यात आली आहेत. या सिमेंट नाला बंधाऱ्यावर ९ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामधून १८ हेक्टर शेतीच्या सिंचनाला पाण्याची उपलब्धता झाली आहे. गंगाझरी येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामातून २९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे सडक-अर्जुनीच्या भागात धानिपकावर लष्करी अळीचा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून यासाठी औषधाचीही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानात चांगले सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार देवराम भवरीया, सरपंच ममता लिल्हारे, कृषी सहायक आर.एस. तिबुडे, उपविभागीय कृषी अधिकारी एन.बी. नायनवाड, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. वाहणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्र माला गंगाझरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. वाहणे यांनी मानले. (प्रतिनिधी)