शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शेतकऱ्यांना खरीपातील धानाच्या बोनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

केशोरी : शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून प्रति क्विटल ७०० रूपये प्रमाणे बोनस रक्कम मंजूर केली आहे. परंतु अजूनही ...

केशोरी : शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून प्रति क्विटल ७०० रूपये प्रमाणे बोनस रक्कम मंजूर केली आहे. परंतु अजूनही शासनाने बोनस रक्कम शेतकऱ्यांना प्रदान केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रती रोष असून खरीप हंगामातील विकलेल्या धानाचे बोनस केव्हा मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उत्पादित केलेले धान पीक शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना विकले. शेतकऱ्यांनी विकलेल्या धानावर प्रति क्विंटल ७०० रूपये प्रमाणे शासनाने बोनस रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. परंतु अजूनही मंजूर केलेली बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांच्या मनात रोष व्याप्त आहे. यावर्षी खरीप हंगाम येवून ठेपला असून या खरीप हंगामासाठी लागणारे बि-बियाणे, औषध, खते इत्यादी खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा असणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील बोनस रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर येत्या खरीपाचा खर्च भागविणे सहज शक्य होणार आहे. परंतु गेल्या वर्षीच्या खरीपातील बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तत्काळ बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.