शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांची होतेय कुचंबना

By admin | Updated: January 19, 2017 01:30 IST

बाक्टी (चान्ना) येथील गोदामात जागा नसल्याने धान खरेदी बंद झाली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे.

ग्रेडरची मनमानी : धान खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे धान उघड्यावर अर्जुनी मोरगाव : बाक्टी (चान्ना) येथील गोदामात जागा नसल्याने धान खरेदी बंद झाली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. हे धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शासनाने आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू केले. तालुका खरेदी विक्री संघामार्फत धान खरेदी सुरू आहे. मात्र बाक्टी येथील केंद्रावर पर्याप्त सुविधा नाहीत. या केंद्रावर चान्ना, बाक्टी, येरंडी व इंजोरी ही गावे समाविष्ट आहेत. आजमितीस ३ हजार ४४७ पोती धान खरेदी झाली. चार गावांच्या शेतमालाच्या तुलनेत येथील गोदाम अपर्याप्त आहे. हे गोदाम पूर्णपणे भरल्याने २६ नोव्हेंबरच्या दुपारपासून खरेदी बंद करण्यात आली. बाक्टी येथील धान खरेदी केंद्र १६ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. तत्पूर्वीच केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणले. धान खरेदी नोंदणी पुस्तिकेत क्रमवार नोंदणीची मागणी शेतकऱ्यांनी ग्रेडर शिवणकर यांच्याकडे केली. त्याने सातबाराच्या उताऱ्याची मागणी केली. तलाठ्यांचा संप असल्याने वेळेवर उतारे मिळणे अशक्य होते. नेमक्या या संधीचा लाभ घेवून काही नजीकच्या शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आले. येरंडी येथील गणेश बाबुराव ब्राम्हणकर या शेतकऱ्याने सातबाराचा उतारा देवून १० नोव्हेंबर रोजी म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच धान केंद्रावर आणले. १६ नोव्हेंबर रोजी केंद्र सुरू झाले. मात्र अद्यापही त्यांचा नंबर लागला नाही. उलट त्यानंतर धान खरेदी केंद्रावर विक्रीस आलेले धान खरेदी करण्यात आले. अद्यापही गोदामात आणखी शिल्लक असलेल्या जागेत धान समाविष्ट होऊ शकते. मात्र पूर्णपणे भरल्याचे कारण सांगून खरेदीच बंद करण्यात आली. या केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. त्यांना अर्जुनी मोरगाव येथील केंद्रावर धान आणण्यास सांगितले जाते. यात वाहतूक व हमालीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर अधिकचा बसणार आहे. या केंद्रावर जीर्ण असलेला बारदाना आहे. खरेदी झालेले पोतीही शासकीय बारदान्यात नसून सुमारे २०० ते २५० पोती विना छापा असलेली आहेत. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी अर्जुनी केंद्रावर धान विक्रीसाठी नेले तेव्हा तुमचे बाक्टी केंद्र असल्याने तिथे घेवून जा, असे सांगण्यात आले. आता पुन्हा गोदाम पूर्ण भरले असल्याने तिथे घेवून जा, असे सांगण्यात आले. आता पुन्हा गोदाम पूर्ण भरले असल्याने अर्जुनी येथे नेण्यास सांगण्यात येते. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. काही शेतकऱ्यांजवळ सातबाराचे उतारे नसतानाही त्यांचे धान घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ग्रेडर हा केंद्र बंद असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन न करता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाध्यक्षाच्या घरी बसून असतो, असा आरोप सोनू भोयर, रामचंद्र भोयर, गोपाल लोगडे, हिवराज बोरकर, गणेश ब्राम्हणकर, बाबुराव ब्राम्हणकर यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)