शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची होतेय कुचंबना

By admin | Updated: January 19, 2017 01:30 IST

बाक्टी (चान्ना) येथील गोदामात जागा नसल्याने धान खरेदी बंद झाली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे.

ग्रेडरची मनमानी : धान खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे धान उघड्यावर अर्जुनी मोरगाव : बाक्टी (चान्ना) येथील गोदामात जागा नसल्याने धान खरेदी बंद झाली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. हे धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शासनाने आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू केले. तालुका खरेदी विक्री संघामार्फत धान खरेदी सुरू आहे. मात्र बाक्टी येथील केंद्रावर पर्याप्त सुविधा नाहीत. या केंद्रावर चान्ना, बाक्टी, येरंडी व इंजोरी ही गावे समाविष्ट आहेत. आजमितीस ३ हजार ४४७ पोती धान खरेदी झाली. चार गावांच्या शेतमालाच्या तुलनेत येथील गोदाम अपर्याप्त आहे. हे गोदाम पूर्णपणे भरल्याने २६ नोव्हेंबरच्या दुपारपासून खरेदी बंद करण्यात आली. बाक्टी येथील धान खरेदी केंद्र १६ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. तत्पूर्वीच केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणले. धान खरेदी नोंदणी पुस्तिकेत क्रमवार नोंदणीची मागणी शेतकऱ्यांनी ग्रेडर शिवणकर यांच्याकडे केली. त्याने सातबाराच्या उताऱ्याची मागणी केली. तलाठ्यांचा संप असल्याने वेळेवर उतारे मिळणे अशक्य होते. नेमक्या या संधीचा लाभ घेवून काही नजीकच्या शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आले. येरंडी येथील गणेश बाबुराव ब्राम्हणकर या शेतकऱ्याने सातबाराचा उतारा देवून १० नोव्हेंबर रोजी म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच धान केंद्रावर आणले. १६ नोव्हेंबर रोजी केंद्र सुरू झाले. मात्र अद्यापही त्यांचा नंबर लागला नाही. उलट त्यानंतर धान खरेदी केंद्रावर विक्रीस आलेले धान खरेदी करण्यात आले. अद्यापही गोदामात आणखी शिल्लक असलेल्या जागेत धान समाविष्ट होऊ शकते. मात्र पूर्णपणे भरल्याचे कारण सांगून खरेदीच बंद करण्यात आली. या केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. त्यांना अर्जुनी मोरगाव येथील केंद्रावर धान आणण्यास सांगितले जाते. यात वाहतूक व हमालीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर अधिकचा बसणार आहे. या केंद्रावर जीर्ण असलेला बारदाना आहे. खरेदी झालेले पोतीही शासकीय बारदान्यात नसून सुमारे २०० ते २५० पोती विना छापा असलेली आहेत. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी अर्जुनी केंद्रावर धान विक्रीसाठी नेले तेव्हा तुमचे बाक्टी केंद्र असल्याने तिथे घेवून जा, असे सांगण्यात आले. आता पुन्हा गोदाम पूर्ण भरले असल्याने तिथे घेवून जा, असे सांगण्यात आले. आता पुन्हा गोदाम पूर्ण भरले असल्याने अर्जुनी येथे नेण्यास सांगण्यात येते. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. काही शेतकऱ्यांजवळ सातबाराचे उतारे नसतानाही त्यांचे धान घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ग्रेडर हा केंद्र बंद असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन न करता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाध्यक्षाच्या घरी बसून असतो, असा आरोप सोनू भोयर, रामचंद्र भोयर, गोपाल लोगडे, हिवराज बोरकर, गणेश ब्राम्हणकर, बाबुराव ब्राम्हणकर यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)