शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धानावरील रोगांनी शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:28 IST

पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय?

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अस्मानी -सुलतानी संकटांनी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय? अशी भिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे.ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर तुडतुडा या रोगाची सर्वात जास्त लागण झाली आहे. उष्ण-दमट वातावरणात या रोगाचा झपाट्याने धानपिकांवर प्रसार होतो. शेतकरी हजारो रुपयांची औषधी खरेदी करुन हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करित आहे. परंतु, तुडतुडा हा नियंत्रणात येत नाही. याबरोबरच पेरवा, फंगीसाईट, रस शोषणारा तांबडा, पांढरा मावा, पाने गुंडाळणारी अळी, त्रिफुली आदी रोगांचे आक्रमण सध्या धान पिकांवर पाहायला मिळत आहेत.धानपिक आता निसवले आहे. जास्त मुदतीचे धानपिक निसवत आहे. परंतु निसवलेल्या लोंबात दाने भरलेले नाही. पेरव्यामुळे अपेक्षित धानाचे उत्पन्न निघणार की नाही अशी चिंता शेतकºयाला सतावत आहे. पूर्वी सारखी दर्जेदार किटकनाशक उपलब्ध होत नसल्याने कीडरोग आटोक्यात आणण्यास अडचण निर्माण होत आहे. फवारणी केल्यानंतरही धानपिकांवरील रोग नियंत्रणात येत नसल्याचे येथील शेतकरी मोहन कापगते यांनी सांगितले. आधीच पावसाच्या लहरीपणाला तोंड देत शेतकºयांनी कशीबशी धानाची रोवणी केली. परंतु आता पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला जातो की काय? अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे. दरम्यान बोंडे (खोली) येथील शेतकरी लालचंद काशिवार हे मंगळवारी (दि.१७) शेतात फवारणी करण्यासाठी पाण्यात औषधी मिसळवित असताना त्यांना विषबाधा झाली. ते गोंदिया येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. बनावट कंपनीच्या बियाणांमुळे आधीच शेतकºयांचे नुकसान झाले. तर आता रोगनियंत्रक औषधी कंपन्या शेतकºयांच्या जीवावर उठल्या आहेत. सुल्तानी व अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त झाला आहे.१२-१३ आॅक्टोबर रोजी आलेल्या वादळामुळे देवलगाव व लगतच्या गावात उभे पीक जमिनीवर पडले. त्यामुळेही परिसरात धानपिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवलगाव येथील शेतकरी युवराज नंदागवळी यांच्या दोन एकर शेतात उभे असलेले धानपिक तुडतुळा व मावा या रोगाने पुरते नष्ट झाले आहे. चार-पाच वेळा औषधी फवारणी केली परंतु त्याचा फायदा झाला नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता त्यांनीही ढगाळ वातावरण हे या रोगाला पोषक आहे. त्यांनीही यावर हमखास उपाय नाही, असे सांगितले. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कीडरोगामुळे धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना मदत देण्याची मागणी शेतकºयांनाकडून होत आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना पीक विमा योजनेतंर्गत लाभ देण्यात यावा. या मागणीचे निवेदन देखील शेतकºयांनी कृषी विभागाला दिले.१२ व १३ आॅक्टोबर रोजी वादळी पावसामुळे धानपिकांच्या नुकसानीबाबत देवलगाव, सुकळी, बाराभाटी येथील शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांची पाहणी करुन प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यावर प्रत्यक्ष पाहणी व शेतीचे पंचनामे होतील. प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.- संजय रामटेकेमंडळ कृषी अधिकारीनवेगावबांध