शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

धानावरील रोगांनी शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:28 IST

पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय?

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अस्मानी -सुलतानी संकटांनी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय? अशी भिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे.ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर तुडतुडा या रोगाची सर्वात जास्त लागण झाली आहे. उष्ण-दमट वातावरणात या रोगाचा झपाट्याने धानपिकांवर प्रसार होतो. शेतकरी हजारो रुपयांची औषधी खरेदी करुन हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करित आहे. परंतु, तुडतुडा हा नियंत्रणात येत नाही. याबरोबरच पेरवा, फंगीसाईट, रस शोषणारा तांबडा, पांढरा मावा, पाने गुंडाळणारी अळी, त्रिफुली आदी रोगांचे आक्रमण सध्या धान पिकांवर पाहायला मिळत आहेत.धानपिक आता निसवले आहे. जास्त मुदतीचे धानपिक निसवत आहे. परंतु निसवलेल्या लोंबात दाने भरलेले नाही. पेरव्यामुळे अपेक्षित धानाचे उत्पन्न निघणार की नाही अशी चिंता शेतकºयाला सतावत आहे. पूर्वी सारखी दर्जेदार किटकनाशक उपलब्ध होत नसल्याने कीडरोग आटोक्यात आणण्यास अडचण निर्माण होत आहे. फवारणी केल्यानंतरही धानपिकांवरील रोग नियंत्रणात येत नसल्याचे येथील शेतकरी मोहन कापगते यांनी सांगितले. आधीच पावसाच्या लहरीपणाला तोंड देत शेतकºयांनी कशीबशी धानाची रोवणी केली. परंतु आता पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला जातो की काय? अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे. दरम्यान बोंडे (खोली) येथील शेतकरी लालचंद काशिवार हे मंगळवारी (दि.१७) शेतात फवारणी करण्यासाठी पाण्यात औषधी मिसळवित असताना त्यांना विषबाधा झाली. ते गोंदिया येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. बनावट कंपनीच्या बियाणांमुळे आधीच शेतकºयांचे नुकसान झाले. तर आता रोगनियंत्रक औषधी कंपन्या शेतकºयांच्या जीवावर उठल्या आहेत. सुल्तानी व अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त झाला आहे.१२-१३ आॅक्टोबर रोजी आलेल्या वादळामुळे देवलगाव व लगतच्या गावात उभे पीक जमिनीवर पडले. त्यामुळेही परिसरात धानपिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवलगाव येथील शेतकरी युवराज नंदागवळी यांच्या दोन एकर शेतात उभे असलेले धानपिक तुडतुळा व मावा या रोगाने पुरते नष्ट झाले आहे. चार-पाच वेळा औषधी फवारणी केली परंतु त्याचा फायदा झाला नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता त्यांनीही ढगाळ वातावरण हे या रोगाला पोषक आहे. त्यांनीही यावर हमखास उपाय नाही, असे सांगितले. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कीडरोगामुळे धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना मदत देण्याची मागणी शेतकºयांनाकडून होत आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना पीक विमा योजनेतंर्गत लाभ देण्यात यावा. या मागणीचे निवेदन देखील शेतकºयांनी कृषी विभागाला दिले.१२ व १३ आॅक्टोबर रोजी वादळी पावसामुळे धानपिकांच्या नुकसानीबाबत देवलगाव, सुकळी, बाराभाटी येथील शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांची पाहणी करुन प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यावर प्रत्यक्ष पाहणी व शेतीचे पंचनामे होतील. प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.- संजय रामटेकेमंडळ कृषी अधिकारीनवेगावबांध