शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विम्याची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

गोंदिया: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध योजना ...

गोंदिया: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण पातळीवर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेऊन जोखीम पत्करून कोरोनाची कामे केली जातात. त्या ग्रा.पं. कर्मचाऱ्यांंना असलेल्या विमा कवचाची मुदत वाढविण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने केली आहे.

भारत सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत, न्यू इंडिया इन्श्युरंश कंपनीच्या अपघात विमा योजने अंतर्गत राज्यातील ग्राम पंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ९० दिवसांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याबाबतचा निर्णय ३१ मार्च २०२० रोजी आपल्या ग्रामविकास विभागाच्यावतीने शासन स्तरावर घेतला. या शासननिर्णयामध्ये वेळोवेळी सुधारणा करून मुदतवाढसुध्दा देण्यात आली होती. या शासननिर्णयामुळे मागील एक वर्षात कोराेनाच्या आजाराने मृत्यू झालेल्या राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. ५० लाख कोरोना विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ ही होती. या कालावधीतील प्रस्तावाची अंतिम मुदत २४ एप्रिल २०२१ ही होती तीसुध्दा संपलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या २८ एप्रिलच्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेत काम करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच्या विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ नंतर पुढील १८० दिवसांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रा.पं. कर्मचारी जीवाची पर्वा न करता महामारीच्या काळात गेल्या एक वर्षापासून अहोरात्र मेहनत करीत आहे. यांनाही २४ मार्च २०२१ नंतर कोरोना आजाराने जर कर्मचाऱ्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ देण्यासाठी विमा कवच योजनेची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य संघटक मिलिंद गणवीर, राज्य सचिव नीलकंठ ढोके यांनी केली आहे.